शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

सुट्यांमुळे रखडले खरडलेल्या जमिनींचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 3:51 PM

नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले.

ठळक मुद्दे२२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते.

वाशिम : २२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या; तर काहीठिकाणी केलेली पेरणी वाहून गेली. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले. सोमवारपासून मात्र ही प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षी सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे यंदा अल्पावधीतच शेतशिवारांमधील जलस्त्रोत पूर्णत: आटले होते. अशा बिकट परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील काही शेतकºयांनी चालू पावसाळ्यात पहिल्या एक-दोन पावसाच्या भरोशावर खरीप हंगामातील पेरणी उरकती घेतली. अनुकूल वातावरणामुळे बीजांकुर होऊन पिके देखील डोलायला लागली. मात्र, २२ जूनच्या मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकवेळ शेतकºयांना संकटात पाडले असून नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसून शेलगाव बोंदाडे, कळमेश्वर, अनसिंग, सोंडा, इलखी, कोंडाळा महाली या गावांसह इतरही अनेक गावांमधील शेतजमिनी खरडल्या गेल्या. काही शेतशिवारांमध्ये तर माती वाहून गेल्याने सद्या सर्वत्र दगडधोंडे पसरल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनींमध्ये दुबार पेरणी होण्याचीही शक्यता धुसर असल्याने शेतकरी पुन्हा एकवेळ मोठ्या संकटात सापडले आहेत. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते. मात्र, सुट्यांमध्ये रममान प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठी अशा तीन लोकांच्या चमूचे पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यावर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार, २२ जूनच्या पावसाने झालेल्या नुकसानाचेही सर्वेक्षण केले जाईल.- बाळासाहेब बोराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी