शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:06 PM

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे.

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे,  बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात वाशिम जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी केली होती. चाचपणीअंती जिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे. अद्याप केवळ आठ गावांचा अपवाद वगळता कुणीही प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. विहिर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित’ असा फलकही लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी