शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

अधिकारी, कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:15 AM

वाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देवाशिम नगर परिषद मुख्याधिकारी, अध्यक्षांनी हाती घेतले झाडू!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.या अभियानादरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो इ. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रेल्वेस्थानक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध भागातील स्वच्छता करून नागरिकांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पद्धतीने जनजागृती उपक्रम राबवून जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले होते. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी केले. तसेच आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, याबाबतसुद्धा मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा, सभापती राहुल तुपसांडे, उमेश मोहळे, बाजार समितीचे सदस्य हिराभाई जानीवाले,  राजूभाऊ जानीवाले, अभियंता विनय देशमुख,  कनिष्ठ अभियंता राजेश घुगरे, स्वच्छता विभागाचे जितू बढेल,  काष्टे, राजेश महाले,  संतोष किरळकर, नागापुरे, यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी, नगर परिषदेचे पदाधिकारी व बाजार समितीमधील सदस्यांची उपस्थिती लाभली होती.

 १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष जनजागृती अभियानांतर्गत शहरात विविध भागांची स्वच्छता करून जनजागृतीचे कार्य हाती घेण्यात आले आहे.- गणेश शेटेन.प. मुख्याधिकारी, वाशिम

शहर स्वच्छतेला आपण सुरुवातीपासूनच महत्त्व दिले आहे. त्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविणार असलेले ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आले. यामुळे आपला उद्देश सफल झाला. यासाठी सर्व जण तन-मन-धनाने काम करणार आहेत.- अशोक हेडा, नगराध्यक्ष