शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
2
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
3
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
4
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
5
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
6
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
7
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
8
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
9
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
10
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
11
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
12
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
13
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
14
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
15
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
16
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
17
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
18
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
19
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
20
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात

पूर्वपरवानगीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यास मनाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 2:29 PM

गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील विनापरवानगी जिल्हा परिषद मुख्यालयात येता येणार नाही, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. 

ठळक मुद्देअधिकाºयांना आढावा बैठकीसाठी बोलाविणे अत्यंत आवश्यक असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय बोलाविता येणार नाही. जिल्हा परिषदमधील इतर कर्मचारी शासकीय कामकाज नसताना, त्यांचे कार्यालय सोडून जिल्हा परिषदमधील कार्यालयात फिरताना आढळून येतात.

 

वाशिम - गटस्तरावरील कामकाजात खोळंबा निर्माण होऊ नये म्हणून पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी, विभाग प्रमुख व अन्य कर्मचाºयांना यापुढे जिल्हा परिषद मुख्यालयात आवश्यक असलेल्या बैठकीसाठी बोलाविताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील विनापरवानगी जिल्हा परिषद मुख्यालयात येता येणार नाही, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. 

वाशिम जिल्हा परिषद मुख्यालयात एकूण १५ विभाग असून, गटविकास अधिकारी, पंचायत समिती स्तरावरील खाते प्रमुखांना जिल्हा परिषद मुख्यालयात कोणत्याही बैठकीसाठी बोलाविण्यात येते. यामुळे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांना गटस्तरावरील विकास कामांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम विकास कामांवर होतो. यापुढे गटविकास अधिकाºयांना आढावा बैठकीसाठी बोलाविणे अत्यंत आवश्यक असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय बोलाविता येणार नाही. 

तसेच गट स्तरावरील बरेचसे गट क व गट ड संवर्गातील कर्मचारी हे रोज जिल्हा परिषद मुख्यालयात फिरताना निदर्शनात आले. त्यामुळे नियमित टपाल घेऊन येणाºया गट ड कर्मचाºयांव्यतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यास जिल्हा परिषद मुख्यालयात पाठविण्यात येऊ नये, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी केल्या. 

गटस्तरावरील कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषदमधील इतर कर्मचारी शासकीय कामकाज नसताना, त्यांचे कार्यालय सोडून जिल्हा परिषदमधील कार्यालयात फिरताना आढळून येतात. यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होऊन ‘पेंडन्सी’चे प्रमाण वाढीस लागते. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या या अनावश्यक फिरतीवर निर्बंध आणले आहेत. यापुढे गट स्तरावरील वर्ग तीन व चारच्या कोणत्याही कर्मचाºयास जिल्हा परिषद मुख्यालयात कोणत्याही प्रकारचे शासकीय कामकाजाकरिता येणे आवश्यक असल्यास त्याबाबत गटस्तरावरील गटविकास अधिकारी किंवा विभाग प्रमुखांकडून टिप्पणी मंजूर करून दौºयावर पाठवावे तसेच ज्या कामाकरिता दौºयावर ज्या विभागामध्ये आले असतील, ते काम करून परत कधी गेले याबाबत संबंधित कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, संबंधित कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे. सदर प्रमाणपत्र असल्याशिवाय संबंधितांचे वेतन व भत्ते अदा करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. 

पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांनी कोणत्याही वर्ग तीन व चारच्या कर्मचाºयास किरकोळ कारणासाठी मुख्यालयांत पाठवू नये, अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास सदरच्या कर्मचाऱ्यांस परवानगीसह पाठविण्यात यावे तसेच जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांनी यासंदर्भात कार्यालयात नोंदवही ठेवून कामानिमित्त आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घ्यावी, अशा सूचना देतानाच कर्तव्यात दिरंगाई करणाºयांविरूद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद, सेवा शिस्त व अपिल नियम १९६४ मधील तरतुदीनुसार एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद