शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे वाढली विद्यार्थी संख्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 3:03 PM

विविध उपक्रमांमुळे आता शाळेच्या पटसंख्येचा आलेख चढता आहे. सन २०१८-१९ मध्ये ८४ आणि २०१९-२० मध्ये ९१ पटसंख्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चार वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या कमी असणाऱ्या मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रमासह जादा शिकवणी वर्गावर भर देण्यात आला. याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून, दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे दिसून येते.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, असे म्हटले जाते. पूर्वीच्या तुलनेत आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही लोकवर्गणी व शासन निधीमधून भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील जिल्हा परिषद शाळेतही लोकवर्गणी व शासन निधीतून भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. आकर्षक रंगरंगोटी तसेच निसर्गरम्य वातावरण निर्मिती करण्यात आली. वारंगी येथे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून येथील पटसंख्या सन २०१७-१८ मध्ये ७६ होती. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. नवोदय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष शिकवणी वर्ग घेण्यात येतात. डिजिटल शाळा असल्याने विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळणेही सुलभ झाले आहे. विविध उपक्रमांमुळे आता शाळेच्या पटसंख्येचा आलेख चढता आहे. सन २०१८-१९ मध्ये ८४ आणि २०१९-२० मध्ये ९१ पटसंख्या आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापन केले जात असल्याने ते समजण्यास सुलभ जात आहे.विविध स्पर्धांवर भरजिल्हा परिषद वारंगी शाळेत विविध स्पर्धा घेण्यात येतात. विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, स्टेज डेअरिंग, व्यावहारिक ज्ञान, अंगभूत गुणांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रांगोळी, हस्ताक्षर, कागदी वस्तू बनविणे, गाव स्वच्छता मोहिमेत सहभाग, वेशभूषा, वर्ग सजावट आदी स्पर्धा घेतल्या जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून २०१८-१९ मध्ये १८ हजार रुपयांची बक्षीस प्राप्त झाली.गावकरी मंडळी, पालक व शिक्षकांच्या सहकार्यामुळेच शाळेची प्रगती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जात आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमावर भर आहे.- गजानन बळी, मुख्याध्यापकशिकविण्याबरोबरच विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची मोलाची भूमिका आहे.- विजय हेंबाडे, पालक

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी