शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 2:09 PM

पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत जंगलात चाऱ्याची उपलब्धता नाही. त्यामुळे वन्यप्राणी शेतशिवार आणि लोकवस्तीत धाव घेत आहेत. यात पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे. तथापि, तोकडा निधी, जटील अटीमुळे वनविभागालाही या प्रकारावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे. वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना रोखण्यासाठी लावलेले कुंपणही तकलादू आहेत. त्यामुळेच वनविभागाकडे पिकहानीसह मनुष्यहानीबाबत दाखल होणाºया प्रस्तावांची संख्या वाढतच आहे.जिल्ह्यात वाशिम वनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक वन परिक्षेत्राचा विस्तार आहे. या प्रादेशिक वनपरिक्षेत्रात हरीण, काळविट, निलगाय, माकड, भेकर, रानडुक्कर, अस्वल, तरस, बिबट, ससा, कोल्हा, रानमांजर, सायाळ आदि वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. आता वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झालेली नसली तरी, वन्यप्राण्यांच्या संख्येत खुप वाढ झाली आहे. मर्यादीत असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यासाठी चारा, पाण्याची सोय नसल्याने हे प्राणी लोकवस्ती आणि शेतशिवारात धाव घेत आहेत. त्यामुळे पिक नुकसानाच्या घटनांसह पाळीव प्राण्यांसह मानवावरही या प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. या प्राण्यांना लोकवस्तीपासून दूर आणि वनपरिक्षेत्रातच राहण्यास बाध्य करण्यासाठी वनविभागाकडून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. प्रत्यक्षात मर्यादत निधी आणि जटील अटींमुळे वनविभागाच्या प्रयत्नांवरही मर्यादा येत आहेत. वन्यप्राण्यांवर नियंत्रणासाठी वनपरिक्षेत्रालगत कुंपण बांधण्यासह मोठे खंदक खोदण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे; परंतु सोहळ काळविट अभयारण्यातील काही भाग आणि काटेपूर्णा अभयारण्यातील काही भाग वगळता इतर कोठेही कुंपण वा खंदक खोदण्यात आलेले नाहीत. त्यातही सोहळ काळविट अभयारण्यातील कुंपण हे तकलादू असल्याने त्याची पार दैना झाली आहे. पीक नुकसानाच्या प्रकारांत वाढवाशिम जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यानचा काळ सोडला, तर इतर सर्वच महिन्यात शेतशिवारात पिके उभी असतात. याच पिकांवर रानडुक्कर, माकडे, निलगाई आणि हरणांचे कळप ताव मारून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. यंदा जुन महिन्यापासून आजवर अवघ्या अडिच महिन्यांतच पीक नुकसान झाल्यामुळे वनविभागाकडे तब्बल २९४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रकरणांना मंजुरीही देण्यात आली आहे. तथापि, या नुकसानातील भरपाईचे प्रमाण नगण्य असल्याने सर्व शेतकºयांना मिळून केवळ ५ लाख ८६ हजार रुपये मिळाले आहेत. वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, चार महिन्यांत ६ लोक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तर सहा पाळीव प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.

बिबट्याचा संचारही वाढलावाशिम जिल्ह्यांतर्गत येणाºया वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट्याचे अस्तित्व असून, या हिंस्त्रप्राण्याचाही शेतशिवारात संचार वाढल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव, कारंजा तालुक्यातील एका गावासह मालेगाव तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन शेतकरी शेतमजुरांना घडत आहे. मालेगाव तालुक्यात किन्हीराजा ते कवरदरी या मार्गावरील बाबनदरीच्या घाटात बिबट्याने रोहीची शिकार करून ठार मारल्याची घटना ४ आॅगस्ट रोजी घडली. यामुळे बिबट्याच्या भितीने किन्हीराजासह या मार्गावरील कवरदरी, पिंपळशेंडा, वाडी रामराव आदी गावांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनपरिक्षेत्राच्या तुलनेत वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. हे वन्यप्राणी जंगलातच थांबावेत म्हणून वनपरिक्षेत्रालगत खंदक खोदणे, कुंपण उभारणे आदि कामे करता येतात; परंतु यापुढे शेतशिवारातील वन्यप्राण्यांचा संचार रोखण्यासाठी कुठलीही उपाय योजना आम्हाला करणे शक्य नाही आणि त्याच्या काही सुचनाही नाहीत. पीक नुकसान किं वा मनुष्यहानीबाबत दाखल प्रस्तावांना निर्धारित निकषानुसार मदत केली जाते.-किशोर येळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू)प्रादेशिक वनविभाग वाशिम

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागagricultureशेतीFarmerशेतकरी