शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकांची लूट कधी थांबणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:44 IST

वाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आहे. विविध वस्तू व सेवांच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट कधी थांबणार? असा सवाल ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. बाजारपेठेतील राजा म्हणून ग्राहकांकडे पाहिले जाते. मात्र, विविध प्रकारची प्रलोभने, अन्न भेसळ, बनावट वस्तू आदींमुळे हा ‘राजा’च वस्तू, साहित्य खरेदी करताना संभ्रमात पडला आहे. अनेकवेळा फसवणूकही होते. एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने, चांदीचे नाणे मोफत मिळेल यासह विविध प्रलोभने दाखवून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागले असल्याचे दिसून येते. दैनंदिन व्यवहारात भेसळयु्क्त माल मिळणे, कमी प्रतीचा माल मिळणे, वजनमापात फसवणूक, छापील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त किंमत आकारणे पाहावयास मिळते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा, वजन मापे कायदा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा असे निरनिराळे बरेचसे कायदे अंमलात आले. मात्र, या कायद्याची अनेक ग्राहकांना माहिती नसते तर अनेकवेळा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही. त्यामुळे विविध माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत.  बिलांच्या पावतीलाही खोवस्तू व पदार्थ्यांच्या किंमतींमधून ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच शासनाचा कर बुडू नये म्हणून प्रत्येक ग्राहकांना बिलाची पावती देणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र, या नियमाची दुकानदार व व्यावसायिकांकडून बºयाच प्रमाणात पायमल्ली होते. मागणी केल्याशिवाय बिल दिले जात नाही, याचा प्रत्यय ग्राहकांना येतो.  अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याचाही धाक नाही‘अन्ना’शिवाय मानवी शरिरात जीवंतपणाच राहू शकत नाही. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून स्वत:ची तुंबडी भरणारी टोळीच सक्रिय झाल्याने मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोणत्या क्षेत्रातून पैसा कमवावा याचेही भाव या महाभागांना राहिले नसल्याने ते इतरांना जणू मरणाच्या दारातच नेऊन सोडत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करणारा स्वतंत्र विभागही स्थापन झाला. मात्र, या विभागालादेखील ही भेसळ रोखता आली नसल्याचे दिसून येते. वस्तू खरेदी करताना अशी घ्यावी काळजी१) फसव्या प्रलोभनांना बळी पडू नये.२) वस्तू खरेदी करताना एमआरपीपेक्षा जास्त रक्कम देऊ नका३) वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.४) डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा५) वस्तू खरेदी करताना ‘एक्सपायरी डेट’ तपासा६) आॅनलाईन खरेदी करताना सजग राहा७) काही शंका, तक्रार असेल तर ग्राहक न्यायालय तसेच जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी

टॅग्स :washimवाशिमconsumerग्राहक