शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

‘सुजलाम,सुफलाम’च्या कामांसाठी महिनाभराची मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 2:20 PM

एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून ‘सुजलाम, सुफलाम’ अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रशासनाने जलसंधारणाची विविध कामे केली. त्यापैकी एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. आता ही कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तथापि, या कामांसाठी ३१ डिसेंबरपर्यंतचीच मुदत असून, सद्यस्थितीत सर्वच जलस्त्रोतात पाणी असल्याने ही कामे करण्याचे आव्हानच प्रशासनासमोर उभे झाले आहे.वाशिम जिल्ह्यात १४ नोव्हेंबर २०१८ पासून सुजलाम, सुफलाम अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरात साठवण तळे, ढाळीचे बांध, दगडी नाला बांध, नाला खोलीकरण, समतल चर आदि मिळून ४०३८ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी बीजेएसच्यावतीने प्रशासनाच्या मागणीनुसार ३५ जेसीबी आणि १७ पोकलन मशीनही उपलब्ध करण्यात आल्या; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रस्तावित ४९ शेततळ्यांपैकी केवळ एक शेततळे पूर्ण करण्यात आले, तर इतर शेततळ्यांपैकी ४ शेततळे वगळता वाढत्या खर्चासह इतर अडचणींमुळे काही रद्द करावी लागली. त्यानंतर या अभियानातील सर्व मिळून जलसंधारणाची ७३५ कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले. तथापि, जुलै महिन्यानंतर पावसाळ्यामुळे ही कामे सुरुच होऊ शकली नाहीत, तर आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात ५८४ ढाळीचे बांध, १०७ नाला खोलीकरण आणि ४ साठवण शेततळ्यांसह इतर काही कामांचा समावेश आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नाले, नद्यांसह इतर जलस्त्रोता मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ही कामे करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाला प्रतिक्षा करावी लागणार असून, आता महिनाभरात कामे होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२९७ कामांतून ५६८ कोटीर लीटर जलसाठाजिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत गतवर्षी अनेक कामे विविध तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिली असली तरी, याच अभियानातून जलसंधारणाची विविध प्रकारची २९७ कामेही पूर्ण करण्यात आली असून, या कामांमुळे आता जिल्ह्यात ५६८ कोटी लीटरचा अतिरिक्त जलसाठाही निर्माण झाला आहे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील भुजल पातळीसाठी होणार आहेच शिवाय शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे.सुजलाम, सुफलाममधील प्रलंबित कामांपैकी काही कामे तांत्रिक अडचणींमुळे रद्द करावी लागली, तर काही कामे जलयुक्त शिवार अभियानातून केली जाणार आहेत. यातील अडचणींचा विचार न करता कामे कशी करता, येतील त्याचे नियोजन करण्यावरच भर दिला जात आहे.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम