शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधींमधून संमिश्र प्रतिक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST

कोट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प असमाधानकारक आहे. जीएसटी व इतर करांबाबत यामध्ये काहीच दिले नाही. शैक्षणिक धोरण व्यवस्थित ...

कोट

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प असमाधानकारक आहे. जीएसटी व इतर करांबाबत यामध्ये काहीच दिले नाही. शैक्षणिक धोरण व्यवस्थित नाही. शेतकऱ्यांसाठीदेखील ठोस काहीच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.

- भावना गवळी

खासदार

००

कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला. उद्योग-व्यवसाय ठप्प होते. केंद्रीय अर्थसंकल्पातून बेरोजगार, व्यावसायिकांसाठी आशादायी योजना, उपक्रम अमलात येतील, अशी अपेक्षा होती. परंतु, या अर्थसंकल्पाने या सर्वांचा भ्रमनिरास केला.

- अनंतराव देशमुख

माजी खासदार

०००

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही ठोस नाही. विविध उद्योगधंद्यांना बूस्टर डोज मिळेल, असे वाटत होते. परंतु अपेक्षांची पूर्तता नाही. चार, पाच राज्यांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी केल्याची शंका येते.

- अमित झनक, आमदार

०००००

देशाच्या विकासासाठी चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच शेअर मार्केट आज जबरदस्त वधारले आहे. शेतकरी, रेल्वे, उद्योग, रोजगार, आत्मनिर्भर भारत यांना चालना देणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणसावर कोणताही कर लादला गेला नाही.

- राजेंद्र पाटणी, आमदार

००००

कोरोनाकाळात शैक्षणिक संस्थांसह विविध उद्योग, व्यवसाय ठप्प होते. शेतकऱ्यांनादेखील जबर फटका बसला. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प हा सर्वांसाठी दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता या अर्थसंकल्पातून झाली नाही. शैक्षणिक क्षेत्रातही भरीव तरतूद नाही.

- अ‍ॅड. किरणराव सरनाईक, आमदार

००००

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ असा हा प्रकार आहे. पेट्रोल, डिझेलवर जादा कर लावण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनता तसेच शेतकरीबांधवांना फायद्याऐवजी नुकसानदायक आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत असमाधानकारक आहे.

- सुरेश इंगळे, माजी आमदार

००००००००

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा देशहिताच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक आहे. आरोग्य, सुरक्षा, कृषी, उद्योग-व्यापार, रोजगार आदी सर्वांगीण बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात करण्यात आला.

- लखन मलिक, आमदार

००००

केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजकांची मोठी निराशा केली आहे. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेल्यामुळे रोजगारविषयक ठोस तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अपेक्षापूर्ती झाली नाही.

- सुभाषराव ठाकरे, माजी राज्यमंत्री

०००००

केंद्रीय अर्थसंकल्प हा अत्यंत समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील कृषी व उद्योगधंद्यांना चालना देणारा अर्थसंकल्प आहे.

- अ‍ॅड. विजयराव जाधव, माजी आमदार

००

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शिक्षण, उद्योग क्षेत्रासाठी भरीव काहीच नाही.

- प्रकाश डहाके, माजी आमदार