शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अल्प पावसाचा शेतकर्‍यांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:06 IST

पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्‍यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

ठळक मुद्देकाही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच नाही सर्वेक्षणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्‍यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.कारंजा लाड: लाडेगाव येथील काही शेतकर्‍यांच्या जवळपास १00 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला शेंगा धरल्या नसल्याचे समोर आले आहे.पिकांची पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. अपेक्षित उत्पादन घेता यावे म्हणून शेतकर्‍यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. आठवड्यापूर्वी शेतातील सोयाबीन शेंगाचे निरीक्षण केले असता, शेंगा धरल्या नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार सुटीच्या दिवशी पाहणी केली असता, सदर शेतात सोयाबीनला शेंगाच नसल्याचे निदर्शनास आले. मागील तीन वर्षाच्या सरासरीनुसार सोयाबीनचा प्रती एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. यावर्षी अनेक ठिकाणी शेंगाच धरल्या नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनला शेंगा का लागल्या नाहीत, यासंदर्भात कृषी विभागाने संशोधन करावे तसेच नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची मागणी शेतकर्‍यांनी सोमवारी केली.रिसोड: तालुक्यातील मोप गावासह अन्य गावांतील सोयाबीन, तूर व अन्य पिकांची स्थिती नाजूक असून, प्रशासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी मोप येथील शेतकर्‍यांनी रिसोड तहसीलदारांकडे सोमवारी केली. मोप परिसरातील गावांमध्ये मृग नक्षत्रात विलंबाने पावसाचे आगमन झाले. दरवर्षीपेक्षा  यावर्षी २0 दिवस उशिराने पेरणी झाली. परिसरात अल्प प्रमाणात व तेही अनियमित पाऊस पडला. सोयाबीन पिकाला शेंगा, फुले धरण्याच्या काळात  पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकर्‍यांनी वर्तविली. कर्ज काढून बी-बियाणे, खते, तणनाशक, फवारणी आदींचा खर्च केला आणि आता उत्पादनात घट येण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन विमा व इतर अनुदानाचा  लाभ देण्यात यावा, अशी मागणी विठ्ठल कोकाटे,  भिकाजी नागरे, डॉ. श्रीराम गरकळ, रामभाऊ नरवाडे, डॉ. रामेश्‍वर नरवाडे, संतोष घायाळ,  सरपंच  केशरबाई नरवाडे, अशोक नरवाडे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली.मानोरा: इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकर्‍यांच्या शेतामधील पिके पाण्याअभावी तसेच अळ्यामुळे नष्ट होत आहेत. सर्कलमधील गावाची पीक पाहणी करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, पाहणी सात दिवसात न  केल्यास रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा जि.प. सदस्य अनिता राऊत यांनी मानोरा तहसीलदारांना निवेदनाद्वारे ४ सप्टेंबरला दिला. इंझोरी सर्कलमधील भोयणी,  म्हसणी, तोरणाळा, जामदरा, उंबर्डा व इंझोरी  गावात गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडला नाही. पिकांवर किडीच्या प्रादुर्भावमुळे पिके नष्ट  होत आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने   तत्काळ इंझोरी सर्कलमधील पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा आपल्या स्तरावरून सात दिवसांच्या आत पिकांची पाहणी करण्यात न आल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर जि.प. सदस्य अनिता संतोष राऊत, पं.स. सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, संतोष राऊत, रमेश पवार, गोपीचंद राठोड,  सरपंच प्रकाश आडे, साहेबराव राठोड, काशीराम राठोड, नामदेव आडे, दत्ता राऊत, संजय राऊत, काशीराम गावंडे, लिलाबाई राऊत आदींच्या स्वाक्षरी आहेत.