शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

अल्प पावसाचा शेतकर्‍यांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:06 IST

पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्‍यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

ठळक मुद्देकाही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच नाही सर्वेक्षणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्‍यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.कारंजा लाड: लाडेगाव येथील काही शेतकर्‍यांच्या जवळपास १00 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला शेंगा धरल्या नसल्याचे समोर आले आहे.पिकांची पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. अपेक्षित उत्पादन घेता यावे म्हणून शेतकर्‍यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. आठवड्यापूर्वी शेतातील सोयाबीन शेंगाचे निरीक्षण केले असता, शेंगा धरल्या नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार सुटीच्या दिवशी पाहणी केली असता, सदर शेतात सोयाबीनला शेंगाच नसल्याचे निदर्शनास आले. मागील तीन वर्षाच्या सरासरीनुसार सोयाबीनचा प्रती एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. यावर्षी अनेक ठिकाणी शेंगाच धरल्या नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनला शेंगा का लागल्या नाहीत, यासंदर्भात कृषी विभागाने संशोधन करावे तसेच नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची मागणी शेतकर्‍यांनी सोमवारी केली.रिसोड: तालुक्यातील मोप गावासह अन्य गावांतील सोयाबीन, तूर व अन्य पिकांची स्थिती नाजूक असून, प्रशासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी मोप येथील शेतकर्‍यांनी रिसोड तहसीलदारांकडे सोमवारी केली. मोप परिसरातील गावांमध्ये मृग नक्षत्रात विलंबाने पावसाचे आगमन झाले. दरवर्षीपेक्षा  यावर्षी २0 दिवस उशिराने पेरणी झाली. परिसरात अल्प प्रमाणात व तेही अनियमित पाऊस पडला. सोयाबीन पिकाला शेंगा, फुले धरण्याच्या काळात  पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकर्‍यांनी वर्तविली. कर्ज काढून बी-बियाणे, खते, तणनाशक, फवारणी आदींचा खर्च केला आणि आता उत्पादनात घट येण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन विमा व इतर अनुदानाचा  लाभ देण्यात यावा, अशी मागणी विठ्ठल कोकाटे,  भिकाजी नागरे, डॉ. श्रीराम गरकळ, रामभाऊ नरवाडे, डॉ. रामेश्‍वर नरवाडे, संतोष घायाळ,  सरपंच  केशरबाई नरवाडे, अशोक नरवाडे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली.मानोरा: इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकर्‍यांच्या शेतामधील पिके पाण्याअभावी तसेच अळ्यामुळे नष्ट होत आहेत. सर्कलमधील गावाची पीक पाहणी करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, पाहणी सात दिवसात न  केल्यास रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा जि.प. सदस्य अनिता राऊत यांनी मानोरा तहसीलदारांना निवेदनाद्वारे ४ सप्टेंबरला दिला. इंझोरी सर्कलमधील भोयणी,  म्हसणी, तोरणाळा, जामदरा, उंबर्डा व इंझोरी  गावात गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडला नाही. पिकांवर किडीच्या प्रादुर्भावमुळे पिके नष्ट  होत आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने   तत्काळ इंझोरी सर्कलमधील पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा आपल्या स्तरावरून सात दिवसांच्या आत पिकांची पाहणी करण्यात न आल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर जि.प. सदस्य अनिता संतोष राऊत, पं.स. सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, संतोष राऊत, रमेश पवार, गोपीचंद राठोड,  सरपंच प्रकाश आडे, साहेबराव राठोड, काशीराम राठोड, नामदेव आडे, दत्ता राऊत, संजय राऊत, काशीराम गावंडे, लिलाबाई राऊत आदींच्या स्वाक्षरी आहेत.