शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 2:53 PM

‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने विविधांगी वृत्त प्रकाशित करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे. त्यानुषंगाने विहिरींचे अधिग्रहण आणि अतीटंचाईग्रस्त गावांना विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. याअंतर्गत जून २०१९ पर्यंत ५०४ गावांसाठी ४८१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ८ गावांमध्ये विंधन विहीर दुरुस्ती, ४ गावांमध्ये तात्पुरती नळ योजना, ३६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा, तर ४३३ गावांमध्ये विहिर अधीग्रहणाच्या उपाययोजनांचा समावेश आहे.असे असले तरी जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांची पाणीपातळी कमालीची खालावल्याने तथा गावागावांमधील जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवूनही अधिकांश गावांमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये तयार झालेल्या पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाने दिरंगाईचे धोरण अवलंबिले होते. ११ एप्रिल रोजी पार पडलेल्या वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतल्यानेही पाणीटंचाईच्या मुद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, सर्वच तालुक्यांमधील टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट व्हायला लागली. ही बाब ‘लोकमत’ने ८ ते १२ एप्रिलदरम्यान प्रकाशित केलेली पाच भागांची वृत्तमालिका आणि १४ एप्रिलच्या अंकात ‘खैरखेड्यात पेटली पाणीटंचाई!’, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्तामधून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तडकाफडकी दखल घेत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरून सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तत्काळ सादर करण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच विहिर अधिग्रहण, टँकर, नळयोजना दुरूस्ती यासह अन्य उपाययोजना विनाविलंब राबविण्यात याव्या, अशाही सूचना देण्यात आल्या असून अनेक उपाययोजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गावांमध्ये उद्भवणाºया पाणीटंचाईवर प्रभावीरित्या मात करण्यासाठी ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केली जात आहे. तालुकास्तरावरून तहसीलदारांमार्फत पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांचे प्रस्ताव प्राप्त होताच तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुषंगाने २७ गावांमध्ये ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून टँकरही सुरू झाले आहेत.- ह्रषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई