शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘मे’ संपला; तरीही टँकर नाही!

By admin | Updated: June 1, 2017 01:11 IST

रिसोड व मालेगाव तालुक्यातील स्थिती : काही गावांतील पाणीटंचाईची तीव्रता झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड/मालेगाव : गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांपैकी अनेक गावांत यावर्षीदेखील पाणीटंचाई उद्भवलेली असताना, ‘मे’ महिना संपल्यानंतरही प्रशासनाने टँकरची व्यवस्था केली नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी पायपिट होत आहे. दुसरीकडे रिसोड तालुक्यातील काही गावांत जलसंधारण व गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे काही गावांतील पाणीटंचाईची तिव्रता कमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला.गतवर्षी रिसोड तालुक्यात करंजी गरड, लेहणी, केनवड, कुऱ्हा, वाकद, गौंढाळा, नंधाना, गणेशपूर, पिंप्री सरहद्द आदी नऊ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर २३ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले होते. यावर्षी केवळ करंजी गरड येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षीच्या टँकरग्रस्त असलेल्या कुऱ्हा, लेहणी, नंधाना येथे भीषण पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायतने तहसीलकडे प्रस्ताव सादर केले आहेत. अद्याप मंजुरात मिळाली नसल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर पिंप्री सरहद्द येथे गतवर्षीच्या पावसामुळे जलपातळीत वाढ झाल्याने फारशी पाणीटंचाई जाणवत नाही तसेच वाकद दोन शेतकऱ्यांचे बोअर अधिग्रहित करण्यात आल्याने टँकरची गरज भासली नाही. गतवर्षी मालेगाव तालुक्यातील एकांबा, पांगरी नवघरे, मुठ्ठा, दापुरी कालवे, देवठाणा खांब, गांगलवाडी, पांगरी कुटे, खेडी, वरदरी बु., काळाकामठा, कुराळा, पिंपळवाडी, तिवळी, भिलदुर्ग, वाकळवाडी, वाकद, पांगरखेडा, खडकी इजारा, खैरखेडा, रेगाव, राजूरा आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर ८१ कोटी ६४ लाख रुपये खर्च झाले होते. गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांपैकी यावर्षी केवळ पांगरी कुटे, वरदरी, देवठाणा खांब, वाकळवाडी येथे टँकर सुरू झाले. आठ दिवसांपूर्वी राजुरा येथे टँकर सुरू झाले. गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांपैकी खैरखेडा येथे सध्या भीषण पाणीटंचाई आहे. दूषित पाण्याने नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. ‘मे’ महिना सरल्यानंतरही खैरखेडा येथे टँकर सुरू झाले नाही. कुराळा, पिंपळवाडी, गांगलवाडी येथील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यावर्षीदेखील पाणीटंचाई असताना ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पिंप्री सरहद या गावात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई होती. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जलपातळीत वाढ झाली. त्यामुळे फारशी पाणीटंचाई नाही. - व्ही.आर.दांडगे, ग्रामविकास अधिकारी, पिंप्री सरहद्दगतवर्षी वाकद येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी गावातील सर्वाधिक पाणी असणारे दोन बोअर अधिग्रहित केले आहेत. त्यामुळे गावात फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे यावर्षी टँकरचा प्रस्ताव सादर केला नाही.- रत्नप्रभा जामधाडे, सरपंच , ग्राम वाकद ता.रिसोड