शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग, लाखोंचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:11 PM

मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देमानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले.आगीचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मानोरा (वाशिम) - मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमठाणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या भायजी नगर येथे आगामी खरीप हंगामापूर्वी शेत मशागतीची कामे करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी शेतातील धुरे पेटवून दिले. त्याचा मोठा भडका होऊन परिसरात एकमेकांना लागून असलेली घरे आगीच्या कवेत सापडली. त्यात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ही आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. यादरम्यान दिग्रस, मंगरूळपीर, कारंजा येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांमध्ये देवानंद शामराव वाघमारे, गजानन चंपत सोनोने, अरूण सुखदेव पखमोडे, अरूण विश्वनाथ कांबळे, गुलाब मोरकर, सुरेखा गजानन सोनोने, महादेव बापुराव कुडबे, शामराव बिरम, मिसनकर, अशोक उत्तम कोल्हे आदिंच्या घरांचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच मानोराचे तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी एस.बी. जाधव, तलाठी एम.के. खंडारे, के.व्ही. फटकवढाकरे, पी.बी. आचार, एस.डी. शेजोड, एम.एम. रणखांब यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

रिसोड तालुक्यातील रिठद येथे याआधी 7 एप्रिलच्या रात्री सहा घरांना आग लागल्याने 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. रिठद येथील माधव आरु यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले होते. या आगीत शेजारील चार ते पाच घरे जळाली. घराला आग लागल्याचे निदर्शनात येताच, घरातील सर्व मंडळी घराबाहेर पडली. त्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  माधव आरू यांच्या घरातील सोयाबीन, हरबऱ्यासह 55 हजारांची रक्कम जळून खाक झाली होती. माधव आरू यांच्या शेजारी असलेले तुकाराम आरू, विश्वनाथ आरू, कुंडलिक आरू यांच्यासह अन्य एक ते दोन जणांच्या घराला आग लागली. या आगीत जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. 

 

टॅग्स :fireआगwashimवाशिम