शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

By नंदकिशोर नारे | Updated: May 9, 2024 16:41 IST

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

नंदकिशाेर नारे, वाशिम :वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गावकऱ्यांकडून पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असून, संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३७ गावांसाठी ३४ विहीर अधिग्रहण आणि ३ कूपनलिका अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. या उपाययोजना संबंधित गावात राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यंतरापासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. अनेक गावांत पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येऊ लागले.

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी १८८ गावांकरिता २१८ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. यासाठी १ कोटी ६६ लाख ७४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडाही तयार केला होता. या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येत आहे. यात ९ मेपर्यंत ३७ गावांसाठी १७ लाख रुपये खर्चाच्या ३७ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ३४ विहिरी आणि ३ कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई