शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सौर कृषीपंपाच्या लाभापासून शेकडो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:58 IST

शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे.

लोेकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शेतीला अखंडित मिळावी, वीज देयकांचा वाढलेला खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या मागेल त्या शेतकऱ्यास सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी इच्छुक आहेत; परंतु शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे. दरम्यान, १८ मेपर्यंत केवळ जैन इरिगेशन या कंपनीकडून उण्यापूºया १५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप स्थापित झाले असून इतर इच्छुक शेकडो शेतकरी या योजनेपासून अद्याप वंचित असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित ऊर्जेच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्रात सौर कृषीपंप योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. अपारंपारिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेवून राज्यशासनाने शेतकºयांना सौर कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली. याअंतर्गत कृषी पंप सौरऊर्जेशी जोडले जाणार आहेत.विशेष बाब म्हणजे या योजनेंतर्गत मागेल त्या शेतकºयास सौर कृषीपंप दिले जाणार असून कुठलेही ठराविक उद्दीष्ट त्यासाठी ठेवण्यात आलेले नाही. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील अनेक सुज्ञ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. ते निकाली काढून संबंधित शेतकºयांच्या शेतांमध्ये सौर कृषीपंप स्थापित करण्यासाठी महावितरण तद्वतच संबंधित कंपन्यांनी पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या महत्वपूर्ण बाबीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. अशातच १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन कोटेशन मिळविणे आणि अर्ज सादर करण्यासाठी निर्धारित केलेली वेबसाईट देखील बंद असल्याने शेकडो शेतकºयांना अर्ज करता आलेले नाहीत. यामुळे महत्वाकांक्षी समजल्या जात असलेल्या सौर कृषीपंप योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन अश्वशक्ती क्षमता असलेल्या सौर एसी पंपाची आधारभूत किंमत ३ लाख २४ हजार असून त्यासाठी ३० टक्के केंद्राचे अनुदान (९७ हजार २०० रुपये), राज्य शासनाचे पाच टक्के अनुदान (१६ हजार २०० रुपये); तर लाभार्थ्यांचा हिस्सा १६ हजार २०० तसेच याअंतर्गत घ्यावयाचे कर्ज १ लाख ९४ हजार ४०० रुपये असणार आहे. तीन अश्वशक्ती डीसी पंपासाठी आधारभूत किंमत ४ लाख ५ हजार. त्यात केंद्रशासनाचे १ लाख २१ हजार ५००, राज्याचे आणि लाभार्थ्याचे प्रत्येकी २० हजार २५०, कर्जाचा हिस्सा २ लाख ४३ हजार रुपये, पाच अश्वशक्ती ए.सी. पंपासाठी आधारभूत किंमत ५ लाख ४० हजार. त्यात केंद्राचे १ लाख ६२ हजार, राज्याचे आणि लाभार्थ्याचे प्रत्येकी २७ हजार; तर कर्जाचा वाटा ३ लाख २४ हजार रुपये असणार आहे. मात्र, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी