शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

सौर कृषीपंपाच्या लाभापासून शेकडो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:58 IST

शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे.

लोेकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शेतीला अखंडित मिळावी, वीज देयकांचा वाढलेला खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या मागेल त्या शेतकऱ्यास सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी इच्छुक आहेत; परंतु शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे. दरम्यान, १८ मेपर्यंत केवळ जैन इरिगेशन या कंपनीकडून उण्यापूºया १५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप स्थापित झाले असून इतर इच्छुक शेकडो शेतकरी या योजनेपासून अद्याप वंचित असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित ऊर्जेच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्रात सौर कृषीपंप योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. अपारंपारिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेवून राज्यशासनाने शेतकºयांना सौर कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली. याअंतर्गत कृषी पंप सौरऊर्जेशी जोडले जाणार आहेत.विशेष बाब म्हणजे या योजनेंतर्गत मागेल त्या शेतकºयास सौर कृषीपंप दिले जाणार असून कुठलेही ठराविक उद्दीष्ट त्यासाठी ठेवण्यात आलेले नाही. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील अनेक सुज्ञ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. ते निकाली काढून संबंधित शेतकºयांच्या शेतांमध्ये सौर कृषीपंप स्थापित करण्यासाठी महावितरण तद्वतच संबंधित कंपन्यांनी पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या महत्वपूर्ण बाबीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. अशातच १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन कोटेशन मिळविणे आणि अर्ज सादर करण्यासाठी निर्धारित केलेली वेबसाईट देखील बंद असल्याने शेकडो शेतकºयांना अर्ज करता आलेले नाहीत. यामुळे महत्वाकांक्षी समजल्या जात असलेल्या सौर कृषीपंप योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन अश्वशक्ती क्षमता असलेल्या सौर एसी पंपाची आधारभूत किंमत ३ लाख २४ हजार असून त्यासाठी ३० टक्के केंद्राचे अनुदान (९७ हजार २०० रुपये), राज्य शासनाचे पाच टक्के अनुदान (१६ हजार २०० रुपये); तर लाभार्थ्यांचा हिस्सा १६ हजार २०० तसेच याअंतर्गत घ्यावयाचे कर्ज १ लाख ९४ हजार ४०० रुपये असणार आहे. तीन अश्वशक्ती डीसी पंपासाठी आधारभूत किंमत ४ लाख ५ हजार. त्यात केंद्रशासनाचे १ लाख २१ हजार ५००, राज्याचे आणि लाभार्थ्याचे प्रत्येकी २० हजार २५०, कर्जाचा हिस्सा २ लाख ४३ हजार रुपये, पाच अश्वशक्ती ए.सी. पंपासाठी आधारभूत किंमत ५ लाख ४० हजार. त्यात केंद्राचे १ लाख ६२ हजार, राज्याचे आणि लाभार्थ्याचे प्रत्येकी २७ हजार; तर कर्जाचा वाटा ३ लाख २४ हजार रुपये असणार आहे. मात्र, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी