शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

शासकीय रुग्णालयातील ‘फायर सिस्टीम’ गायब

By admin | Updated: September 16, 2014 18:45 IST

कारंजा तालुक्यातील चित्र : रूग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

कारंजालाड: कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातील हजारो रुग्णांवर उपचार केल्या जाणार्‍या कारंजा ग्रामीण रुग्णालयासह, कारंजा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आग प्रतिबंधक उपकरणेच बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेविषयी किती दक्षता बाळगण्यात येते, हे स्पष्ट दिसत आहे. कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात कारंजा तालुक्यासह मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. कारंजा ग्रामीण रुग्णालयात ३0 रुग्णांना दाखल क रून घेण्याची व्यवस्था आहे, तर बाहय़ रुग्ण विभागात दररोज किमान दोनशेहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या रुग्णालयात शासकीय आणि निमशासकीय मिळून एकूण ६0 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय रूग्णांसह येणार्‍या नातेवाईकांची संख्या शंभरच्या आसपास असते. कारंजा तालुक्यात धनज, उंबर्डा बाजार, पोहा, धामणी, मनभा ही पाच प्राथमिक आरोग्य कें द्र आहेत. यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी ६0 हून अधिक रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दररोज ५0 ते ६0 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. या सर्व रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने येथे विविध व्यवस्था असायला हव्यात; परंतु या सर्व रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथम उपाय म्हणून वापरली जाणारी आग प्रतिबंधक उपकरणेच बसविण्यात आलेली नाहीत. यापैकी एकाही रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इतर कुठलीही व्यवस्था किंवा उपकरण नाही. वर्षभरापूर्वी कारंजा ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात आग लागली होती. त्या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी, विविध साहित्य जळाल्यामुळे १५ ते २0 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेपासून बोध घेत रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे बसवायला हवी होती; परंतु तसे झाले नाही. रुग्णांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी करून त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचे क ाम आरोग्य विभाग करीत असल्याचे त्यावरून दिसत आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी फायर ऑडिट करून आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे आदेश असताना कारंजा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.या सर्व रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे बसविण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.