शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

इंग्रजी शाळांतील मोफत प्रवेशाचे टेन्शन मिटले; जुन्या नियमानुसार आरटीईचे प्रवेश

By दिनेश पठाडे | Updated: May 17, 2024 13:29 IST

ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी ३१ मेपर्यंत मुदत

वाशिम : शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात केलेल्या बदलास मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाने आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केली आहे. आता जुन्या नियमानुसारच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. आरटीईपोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून ३१ मेची मुदत देण्यात आली आहे. खासगी इंग्रजी शाळांमध्ये देखील आता वंचित, दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश घेता येणार असल्यामुळे पालकांचे टेन्शन मिटले आहे.

शिक्षण विभागाने आरटीईच्या कायद्यात बदल करून शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या खासगी शाळा आरटीईतून वगळण्यात आल्या. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. न्यायालयाने राज्य शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी जाणार असे स्पष्ट झाले होते. आता प्रत्यक्षात जुन्या नियमानुसारच ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासकीय, अनुदानित शाळा वगळण्यात आल्याने जिल्हानिहाय शाळांची संख्या कमी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १०९ शाळांमध्ये आरटीईच्या ९५३ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. १ कि.मी व १ ते ३ कि.मी अंतरावरील १० शाळा निवडण्याची मूभा पालकांना असेल.

नव्याने अर्ज करावा लागणार

यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे. यापूर्वीचे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शासकीय, अनुदानित शाळा वगळल्यानव्या बदलानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर अनुदानित, सरकारी शाळा उपलब्ध असल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळा संकेतस्थळावर दिसत नव्हती. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळत नसेल तर आरटीई कायद्याचा काय उपयोग असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात होतो. उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर शासकीय, अनुदानित शाळा वगळून जुन्या नियमानुसारच प्रक्रिया राबविली जाणार आहे. ८४१ शाळा वगळण्यात आल्या असून जागांची संख्या देखील १३ हजार ९८ वरुन ९५३ वर आली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा