शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अडाण प्रकल्पामुळे बाधित पाच गावांचा प्रश्न ‘जैसे थे’!

By admin | Updated: April 18, 2017 01:20 IST

प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा यवतमाळ जिल्ह्याला

वाशिम : मानोरा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासाठी घोटी, वाघोळा, म्हसणी, तोरणाळा आणि दिघी या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले; परंतु त्याबदल्यात मिळणाऱ्या अनेक सुविधांपासून या गावातील प्रकल्पबाधित नागरिक व शेतकरी अद्याप वंचित आहेत. जिल्ह्यात १२२ लघू आणि तीन मध्यम प्रकल्प आहेत; मात्र मानोरा तालुक्यात येणारा अडाण प्रकल्प नावापुरताच असून या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांना होतो. या प्रकल्पामुळे मानोरा तालुक्यातील तोरणाळा, म्हसणी आणि वाघोळा या तीन गावांमधील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच गावांचेही पुनर्वसन करण्यात आले. दिघी आणि घोटी या गावांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले; तर घोटी या गावाला जमदरा या गावात समाविष्ट करण्यात आले. म्हसणी हे गाव अडाण प्रकल्पाच्या भिंतीलगत होते. त्या भिंतीला तडे जात असल्याने प्रकल्प फुटण्याच्या भूतीपोटी म्हसणी गावाचे १९८४ मध्ये पुनर्र्वसन झाले. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात कवडीमोल भावात संपादित करण्यात आल्या; मात्र म्हसणीसह इतर चार गावे विकासापासून अद्याप वंचित आहेत. याशिवाय अडाण नदीवरचा प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात उभारण्यात आला असला तरी, त्याचा अधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांनाच होतो. त्यामुळे प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. जलसंपदा विभागाने यावर प्रभावी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.