शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 6:11 PM

राजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. यामध्ये समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचाही समावेश आहे. राजुरा ते खैरखेडा मार्गावरील अनसिंग फाटयावर अमित शिवाजीराव घुगे यांच्या मालकीचे साई एजन्सीच्या माल साठविण्याचे गोडाऊन आहे. घुगे यांच्याकडे नामांकित कंपनीबरोबरच गावातीलच समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठीची एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून उत्पादित कंपन्याचे बर्फी, गुलाब जामून, चॉकलेट, चिवडा, बिस्कीट, लोणचे, मॅगी, नुडल्स, ब्रेड, केक यासह इतरही उत्पादने वाशिम, अकोला जिल्हयातील शहरे व गावात दररोज वितरीत केल्या जातात. विविध प्रकारचा हा माल तसेच कापूस व शेतीपयोगी साहित्यही गोडावूनमध्ये ठेवले होते. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान गोडावूनमधून वितरणासाठीची गाडी भरून देवून अमित घुगे घरी गेले असता, १० वाजतादरम्यान त्यांचे गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर शेतात असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने वाशिम येथील अग्निशामक दल यासह महसूल व पोलिस प्रशासनाला तात्काळ कळविण्यात आले. मात्र अग्निशामक दलाची गाडी पोहचविण्यापुर्वीच गोडावूनमधील माल पुर्णत: जळून खाक झाला होता. घुगे यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.यामध्ये अमित घुगे यांचे जवळपास २० लाख २७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी नागेशराव घुगे यांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे. घटनास्थळावर तलाठी नागेशराव घुगे, पोलिस पाटील डॉ.धनंजय राजुरकर, बिट जमादार उत्तम राठोड, पोलिस कर्मचारी पाटील यांचेसह ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. 

समर्थ बचत गटही आर्थिक संकटात राजूरा येथे कार्यरत समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला माल हा साठवणुकीसाठी घुगे यांच्या गोडावूनमध्ये ठेवत असत. या आगीत त्यांचाही बराचसा माल जळून खाक झाल्याने बचत गटाच्या महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यापुढे कच्चा मालाच्या खरेदीसासाठी आर्थिक संकट ओढावल्याने महिला हतबल  झाल्याचे दिसून येते. रोजगारावरच पाणी फिरल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग