शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दोन मंत्र्यांची भेट घेऊनही टळली नाही शेतकर्‍याची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 02:54 IST

मानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आ त्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

ठळक मुद्देसोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबर रोजी यवतमाळ  येथे केली आत्महत्याआत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीतमंत्र्यांच्या भेटीसाठी मिसाळ यांच्यासोबत गेलेले शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी  केला खळबळजनक खुलासा 

बबन देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आत्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून मानोरा तालुक्यात ओळख असलेले सोयजना येथील शे तकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी आत्महत्येपूर्वी वेगवेगळी चार पत्रे लिहून  ठेवली आहेत. दोन्ही मुलांसाठी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की ते  जगाला ओळखू शकले नाहीत, ‘‘तुम्ही लोकांना ओळखा आणि आईचा सांभाळ  करा. आई नारळासारखी आहे. वरून कठोर असली, तरी आतून गोड आहे,’’  असेही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामध्ये  आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख, महिंद्रा फायनान्सचे अडीच लाख आणि  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दीड लाख रूपयांच्या कर्जाचा समावेश आहे. त्याशिवाय  त्यांनी खासगी कर्जही घेतले होते. त्यांनी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात  जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची भेट घेतली आणि त्यांना आपबिती कथन केली. खुर्चीत बसून शे तकर्‍यांच्या व्यथा कळणार नाहीत आणि समस्याही सुटणार नाहीत, असे परखड  बोल मंत्र्यांना सुनावत त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला, मात्र  मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे निराश होऊन मिसाळ  यांनी आत्महत्या केली. तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे सतत ना िपकी होत असल्याने कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांचा मोठा मुलगा  शेती सांभाळतो. तर लहान मुलगा सागर याने बीएससीची पदवी घेतल्यावर त्याचे  प्रमाणपत्र आणण्यासाठीसुद्धा ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्याकडे पैसे नव्हते. ज्ञानेश्‍वर  मिसाळ यांच्याकडे असलेल्या आठ एकर शेतीमधील संत्रा बाग पावसाअभावी  सुकली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायासाठी पैसे गुंतविले.  त्यासाठी आणखी पैसे हवे असल्याने त्यांनी कोकण ग्रामीण बँकेकडे अर्जही केला;  परंतु कर्ज मिळू शकले नाही, त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यांनी अखेर आत्महत्येचा  मार्ग अवलंबला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या