शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

दोन मंत्र्यांची भेट घेऊनही टळली नाही शेतकर्‍याची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 02:54 IST

मानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आ त्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

ठळक मुद्देसोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबर रोजी यवतमाळ  येथे केली आत्महत्याआत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीतमंत्र्यांच्या भेटीसाठी मिसाळ यांच्यासोबत गेलेले शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी  केला खळबळजनक खुलासा 

बबन देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही,  कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील  शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी अखेर ६ डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आत्महत्या केली. मंत्र्यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यासोबत गेलेले सोयजना  येथील शेतकरी आत्माराम चव्हाण यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून मानोरा तालुक्यात ओळख असलेले सोयजना येथील शे तकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी आत्महत्येपूर्वी वेगवेगळी चार पत्रे लिहून  ठेवली आहेत. दोन्ही मुलांसाठी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की ते  जगाला ओळखू शकले नाहीत, ‘‘तुम्ही लोकांना ओळखा आणि आईचा सांभाळ  करा. आई नारळासारखी आहे. वरून कठोर असली, तरी आतून गोड आहे,’’  असेही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामध्ये  आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख, महिंद्रा फायनान्सचे अडीच लाख आणि  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दीड लाख रूपयांच्या कर्जाचा समावेश आहे. त्याशिवाय  त्यांनी खासगी कर्जही घेतले होते. त्यांनी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात  जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याण मंत्री राजकुमार  बडोले यांची भेट घेतली आणि त्यांना आपबिती कथन केली. खुर्चीत बसून शे तकर्‍यांच्या व्यथा कळणार नाहीत आणि समस्याही सुटणार नाहीत, असे परखड  बोल मंत्र्यांना सुनावत त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला, मात्र  मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे निराश होऊन मिसाळ  यांनी आत्महत्या केली. तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे सतत ना िपकी होत असल्याने कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांचा मोठा मुलगा  शेती सांभाळतो. तर लहान मुलगा सागर याने बीएससीची पदवी घेतल्यावर त्याचे  प्रमाणपत्र आणण्यासाठीसुद्धा ज्ञानेश्‍वर मिसाळ यांच्याकडे पैसे नव्हते. ज्ञानेश्‍वर  मिसाळ यांच्याकडे असलेल्या आठ एकर शेतीमधील संत्रा बाग पावसाअभावी  सुकली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायासाठी पैसे गुंतविले.  त्यासाठी आणखी पैसे हवे असल्याने त्यांनी कोकण ग्रामीण बँकेकडे अर्जही केला;  परंतु कर्ज मिळू शकले नाही, त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यांनी अखेर आत्महत्येचा  मार्ग अवलंबला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या