शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नाफेड केंद्रांवर कसरत!

By admin | Updated: April 18, 2017 01:25 IST

मंगरूळपीर येथे सेना जिल्हाप्रमुखांची अधिकाऱ्यांशी चर्चा : शेतमाल मोजणीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय

वाशिम : हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने नाफेड खरेदी केंद्रावर येत आहेत. मात्र, पूर्वीच्याच तुरीची मोजणी न झाल्याने नाफेड केंद्रावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३६०० ते ४२०० दरम्यान तुरीला बाजारभाव मिळत आहे. हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी नाफेड केंद्रावर मोठ्या संख्येने जात आहेत. मात्र, बारदाण्याचा अभाव व अन्य कारणांमुळे नाफेडचे केंद्र मध्यंतरी बंद होते. त्यानंतर वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथील नाफेड केंद्र सुरू झाले, तर मालेगाव, रिसोड येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही बंदच आहे. वाशिम, मंगरूळपीर येथे पूर्वीच्याच तुरीची मोजणी सुरू आहे. त्यातही नवीन तूर विक्रीसाठी येत असल्याने बाजार समिती परिसरात शेतमालाच्या वाहनांची रांग लागत आहे. हमीभावात तुरीची विक्री करताना शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.मंगरुळपीर : मागील दहा दिवसांपासून बंद असलेली नाफेड तूर खरेदी शेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांचे आक्रमकतेमुळे तत्काळ १७ एप्रिल रोजी दुपारपासून सुरू करण्यात आली.येथील नाफेड खरेदी केंद्र बंद असल्याने मागील दहा दिवसांपासून ताटकळत असलेला तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता. तुरीचे खचाखच भरलेली पोती, भाड्याने आणलेल्या ट्रॅक्टरमध्ये होती. मात्र तूर खरेदीचा मुहूर्त निघेना, शेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी प्रभारी तहसीलदार यांच्या मदतीने उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शेतकऱ्यांची गैरसोय खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा सेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी दिला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून संबंधिताना या प्रकाराबाबत गंभीरता दर्शवून तत्काळ तूर खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजतापासून नाफेडची तूर खरेदीस प्रारंभ झाला. यामुळे मागील दहा दिवसांपासून नाफेड केंद्रावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. मंगरूळपीर नाफेड केंद्र परिसरात शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रिसोड : येथील नाफेड खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. सात दिवसांची मुदतवाढ देऊनही नाफेड केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी बाजारभावाने अन्यत्र तूर विकण्याची वेळ आली आहे. बाजार समिती किंवा अन्य खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.