शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

न उगवलेल्या बियाण्यांच्या अहवालाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 11:25 AM

समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाच्या तालुकास्तर समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार संबंधित शेतकºयाच्या शेताला भेट देऊन पंचनामेही करण्यात आले; तथापि, दोन महिने उलटले तरी, तालुकास्तरीय समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, बियाणे न उगवण्याचे कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल संबंधित बियाणे उत्पादक कंपनीसह नुकसानग्रस्त शेतकºयांनाही द्यावा लागणार आहे. यात बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. तथापि, दोन महिने उलटले तरी, शेतकºयांना न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बियाणे सदोष असले तरच मिळणार अहवाल!जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या हजारो तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी बियाणे न उगवण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. त्यामुळे बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. अर्थात संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई घ्यावयाची की त्यांच्या विरोधात ग्राहक पंचायतमध्ये दाद मागायची, हे शेतकºयांना ठरविता येणार आहे. तथापि, काही सदोष बियाण्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.

वाशिममधील प्रक्रिया पूर्ण४वाशिम तालुक्यात बियाणे न उगवल्याच्या केवळ ४८ तक्रारी झाल्या असून, यात सदोष बियाणे प्रकरणी एका कंपनीवर कारवाई झाली, तर काही शेतकºयांना अहलवाही देण्यात आले आहेत.

न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल तालुकास्तर समित्यांकडून शेतकºयांना देण्यात येत आहेत. ज्या शेतकºयांनी पेरलेले बियाणे सदोष आढळून आले. त्यांना हा अहवाल देण्यात येत असून, ही प्रक्रिया सुरू आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी पेरलेल्या बियाण्यांत दोष आढळून आला आहे. त्यांनाच हा अहवाल मिळणार असून, इतर कारणांसाठी अहवाल देता येणार नाही. .- एम. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी