वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास

By Admin | Updated: May 22, 2014 23:34 IST2014-05-22T23:23:16+5:302014-05-22T23:34:33+5:30

ग्रामीण भागात राजरोसपणे अवैध वृक्षतोड केली जाते. परंतु याकडे महसूल विभाग तथा वनविभागाचे दुर्लक्ष

Environmental degradation due to tree plantation | वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास

कारंजालाड : तालुक्याच्या ग्रामीण भागात राजरोसपणे अवैध वृक्षतोड केली जाते. परंतु याकडे महसूल विभाग तथा वनविभागाचे दुर्लक्ष होत असून, वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. याशिवाय वृक्षतोडीमुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. तसेच ह्यइको व्हिलेजह्ण या संकल्पनेला सुरुंग लागला आहे. एकीकडे शासन पर्यावरण पूरक ग्राम समृद्धी योजनेंतर्गत ह्यइको व्हीलेजह्णसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. त्या अंतर्गत गावोगावी वृक्ष लागवड करून वृक्ष जगविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देत आहे. पण, दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अगोदर असलेली वनसंपत्ती धोक्यात आली आहे. परिसरात काही असामाजिक वृत्तीचे नागरिक तात्परुत्या फायद्यासाठी वृक्षतोड करीत आहेत. वृक्षतोडण्यासाठी महसूल विभागाची कुठलीही रितसर परवानगी घेतली जात नाही. सरळ-सरळ नियमबाह्यपणे वृक्षावर कुर्‍हाड चालवून तोडले जात आहे. तसेच जुने आणि मोठ-मोठे वृक्ष सुद्धा तोडले जात आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. परिणामी, परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षाची संख्या कमी झाली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे जतन होणे गरजेचे आहे. पण, क्षणिक फायद्यासाठी काही जण वृक्ष तोडत आहेत.

Web Title: Environmental degradation due to tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.