शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा

By admin | Updated: October 26, 2014 00:22 IST

रिसोड तालुक्यात पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेच्या निधीचा अपव्यय.

मालेगाव (वाशिम): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सुरू केलेल्या पर्यावरण संतुलन ग्राम योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये झाडे लावणे, त्याची जोपासना करणे, त्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी यामधून जमा झालेल्या ५0 टक्के रकमेचा खर्च वृक्षलागवडीसाठी खर्च करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली करत पर्यावरण संतुलन ग्राम योजना राबवण्यास सुरुवात केली होती. काही गावातील अपवाद वगळता गेल्या ६ वर्षात कुठेही जिवंत झाडे पाहावयास मिळत नाही त्यामुळे घरपट्टी, पाणी पट्टी पोटी वसूल केलेला निधीच्या ५0 टक्के खर्च केलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी व प्रशासनाचे अधिकारी याची प्रभारी अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र आहे. मालेगाव तालुक्यात २0 गावांचा सहभाग होता आता यावर्षी किमान २५ गावे त्या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त गावात या योजनेत सहभागी करून घेणार असल्याचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांनी सांगीतले.

*काय आहे ही योजना?

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजना सुरू करण्यात आली. यामध्ये गावातील लोकसंख्येच्या ५0 टक्के वृक्षलागवड करावी, घरपटी पाणीपट्टी यामध्ये वसुली करून ५0 टक्के रक्कम वृक्षलावडीसाठी खर्च करावी; मात्र वसुली ६0 टक्क्यापेक्षा जास्त गावांमध्ये ५0 टक्केपेक्षा जास्त नागरिक शौचालयाचा वापर करणो आवश्यक आहे. वृक्षलागवड ही गावठाणचा परिसर, ई क्लास, एफ क्लास येथे करावी दुसर्‍या व तिसर्‍या वर्षात वसुली १00 टक्के करावी.