शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

खाद्यतेल झाले स्वस्त; आता चमचमीत खा मस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट तसेच जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे वाढलेले दर यामुळे गतवर्षी दिवाळीच्या आधीपासूनच खाद्यतेलाचे दर वाढायला सुरुवात झाली. ...

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट तसेच जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे वाढलेले दर यामुळे गतवर्षी दिवाळीच्या आधीपासूनच खाद्यतेलाचे दर वाढायला सुरुवात झाली. कालांतराने सर्वच खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले. यामुळे विशेषत: गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णत: विस्कळीत झाले होते. रोजमजुरीचे काम करणाऱ्यांची खाद्यतेल दरवाढीमुळे मोठी फसगत झाली. शासनाकडून दर कमी करण्यासंबंधी ठोस उपाययोजना होत नसल्याने सर्वच स्तरांतून रोष व्यक्त झाला. आता मात्र खाद्यतेलाचे दर काहीअंशी कमी झाल्याने बहुतांश नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

.................

तेलाचे दर (प्रति लिटर)

ऑगस्ट सप्टेंबर

सोयाबीन १५३/१४७

सूर्यफूल १७०/१६०

करडी २००/१८५

पामतेल १४५/१४२

शेंगदाणा १६०/१५५

मोहरी १७०/१६०

तीळ १९०/१८०

..........................

म्हणून दर झाले कमी

वाशिम शहरासह जिल्ह्यात सोयाबीनच्या तेलालाच सर्वाधिक मागणी आहे. नेमक्या या तेलाचे दर वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात वाढले होते. ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे दर लिटरमागे १५३ होते, ते आता १४७ वर स्थिरावले आहेत. तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर कमी झाल्याने दर कमी झाले आहेत.

- रुपेश दागडिया, व्यापारी

...............

किराणा खर्चात बचत

खाद्यतेलाचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या तुलनेत कमी झालेले नाहीत. त्यामुळे विशेष दिलासा मिळालेला नाही. असे असले तरी किराणा साहित्यावर माहेवारी होणाऱ्या खर्चात काहीअंशी आता बचत होणार आहे. शासनाने दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

- रुपाली शिंदे

.......................

घरात स्वयंपाकासाठी सोयाबीनच्याच तेलाचा वापर केला जातो. नेमक्या याच तेलाचा दर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्याने बजेट विस्कळित झाले. आता खाद्यतेलाचे दर कमी झाले; मात्र ते ज्या प्रमाणात व्हायला हवे होते, त्या प्रमाणात झालेले नाही.

- धनश्री बनसोड