शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खाद्यतेल झाले स्वस्त; आता चमचमीत खा मस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट तसेच जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे वाढलेले दर यामुळे गतवर्षी दिवाळीच्या आधीपासूनच खाद्यतेलाचे दर वाढायला सुरुवात झाली. ...

मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट तसेच जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे वाढलेले दर यामुळे गतवर्षी दिवाळीच्या आधीपासूनच खाद्यतेलाचे दर वाढायला सुरुवात झाली. कालांतराने सर्वच खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले. यामुळे विशेषत: गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णत: विस्कळीत झाले होते. रोजमजुरीचे काम करणाऱ्यांची खाद्यतेल दरवाढीमुळे मोठी फसगत झाली. शासनाकडून दर कमी करण्यासंबंधी ठोस उपाययोजना होत नसल्याने सर्वच स्तरांतून रोष व्यक्त झाला. आता मात्र खाद्यतेलाचे दर काहीअंशी कमी झाल्याने बहुतांश नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

.................

तेलाचे दर (प्रति लिटर)

ऑगस्ट सप्टेंबर

सोयाबीन १५३/१४७

सूर्यफूल १७०/१६०

करडी २००/१८५

पामतेल १४५/१४२

शेंगदाणा १६०/१५५

मोहरी १७०/१६०

तीळ १९०/१८०

..........................

म्हणून दर झाले कमी

वाशिम शहरासह जिल्ह्यात सोयाबीनच्या तेलालाच सर्वाधिक मागणी आहे. नेमक्या या तेलाचे दर वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात वाढले होते. ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे दर लिटरमागे १५३ होते, ते आता १४७ वर स्थिरावले आहेत. तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर कमी झाल्याने दर कमी झाले आहेत.

- रुपेश दागडिया, व्यापारी

...............

किराणा खर्चात बचत

खाद्यतेलाचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या तुलनेत कमी झालेले नाहीत. त्यामुळे विशेष दिलासा मिळालेला नाही. असे असले तरी किराणा साहित्यावर माहेवारी होणाऱ्या खर्चात काहीअंशी आता बचत होणार आहे. शासनाने दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

- रुपाली शिंदे

.......................

घरात स्वयंपाकासाठी सोयाबीनच्याच तेलाचा वापर केला जातो. नेमक्या याच तेलाचा दर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्याने बजेट विस्कळित झाले. आता खाद्यतेलाचे दर कमी झाले; मात्र ते ज्या प्रमाणात व्हायला हवे होते, त्या प्रमाणात झालेले नाही.

- धनश्री बनसोड