शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पावसाचे पुन्हा तांडव; शेकडो एकरातील सोयाबीनला फटका, शेतकरी रडकुंडीस 

By दादाराव गायकवाड | Published: October 18, 2022 6:01 PM

वाशिम जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

वाशिम: जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरूच आहे. चालू आठवड्यात दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत तास दोन तास पाऊस धो-धो कोसळत राहिला. या पावसामुळे शेकडो एकरातील सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावल्याने शेतकरी रडकुंडीस येत असल्याचे दिसते. जिल्ह्यात जुलैपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिके होत्याची नव्हती झाली आहेत. जुलै ते सप्टेंबरदरम्यान वारंवार अतिवृष्टी झाल्याने पिकांना फटका बसला. त्यातून वाचलेले सोयाबीनचे पीक काढण्याच्या तयारीत शेतकरी असतानाच ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा धडाका लावला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन नेस्तनाबूद झाले. 

मागील दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या कापणी आणि काढणीचा वेग वाढवला. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवल्या, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेले सोयाबीन पडून होते. अशात मंगळवारी सकाळी १० वाजतापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. यात कापणी करून ठेवलेले शेकडो एकरातील सोयाबीन पाण्यात भिजले. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने आता या सोयाबीनमधून कोणतेही उत्पादन होण्याची शक्यताही उरली नसल्याने शेतकरी रडकुंडीस आले आहेत. कापणी, काढणी करणाऱ्यांची तारांबळमंगळवारी शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून लावलेल्या सुड्यातील सोयाबीनची मळणी यंत्रणातून काढणी सुरू केली होती, तर अनेक शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून कापणी सुरू केली होती; परंतु पावसाने सकाळीच हजेरी लावल्याने कापणी आणि काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात सोयाबीन पाण्यात भिजलेच शिवाय मजुरांची मजुरीही अंगावर आल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरी