शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जोडणीअभावी सौर पंपाचे साहित्य सात महिन्यांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST

महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित ...

महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित कंपनीच्या सौर कृषी पंपाची निवड करून २४ हजार ७१० रुपयांची रक्कम भरली. त्यानुसार संबंधित कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या शेतात कृषी पंपाचे साहित्य पोहोचवून दिले. मात्र, सात महिने उलटले तरी या कृषी पंपाची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे सौर कृषी पंपाचे साहित्य त्यांच्या शेतात धूळखात पडले आहे. त्यातच सौर कृषी पंपाची जोडणी रखडल्याने सिंचनाअभावी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ते याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत असतानाही त्यांची समस्या सोडविण्याची तसदी आजवर घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच शेतात धूळखात पडलेले सौरपंपाचे साहित्य चोरीस जाण्याची भीतीही त्यांनी वर्तविली असून, या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व सौरऊर्जा कंपनीवर राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.