शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

जोडणीअभावी सौर पंपाचे साहित्य सात महिन्यांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST

महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित ...

महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित कंपनीच्या सौर कृषी पंपाची निवड करून २४ हजार ७१० रुपयांची रक्कम भरली. त्यानुसार संबंधित कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या शेतात कृषी पंपाचे साहित्य पोहोचवून दिले. मात्र, सात महिने उलटले तरी या कृषी पंपाची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे सौर कृषी पंपाचे साहित्य त्यांच्या शेतात धूळखात पडले आहे. त्यातच सौर कृषी पंपाची जोडणी रखडल्याने सिंचनाअभावी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ते याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत असतानाही त्यांची समस्या सोडविण्याची तसदी आजवर घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच शेतात धूळखात पडलेले सौरपंपाचे साहित्य चोरीस जाण्याची भीतीही त्यांनी वर्तविली असून, या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व सौरऊर्जा कंपनीवर राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.