शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

वाशिम जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांना ४४ कोटीची दुष्काळी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:06 IST

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळाला मात्र दुष्काळी सवलतीच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रतिक्षा कायम आहे.२०१८ च्या खरीप हंगामात शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, या हंगामातील नुकसानाची पाहणी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (एसडीआरएफ)आणि केंद्र आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून (एनडीआरएफ)करण्यात आली आहे. या पथकाचे निकष आणि अहवालानुसार ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पीक नुकसान झालेल्या शेतकºयांना दुष्काळी मदत दिली जात आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह मालेगाव आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मदत निधी दिला जात आहे. रिसोड तालुक्यात आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषीत आहे. दुष्काळी मदत निधी अजून संपूर्ण पात्र शेतकºयांना मिळालेला नाही. तसेच यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्कही परत मिळालेले नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांनी बुधवारी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीdroughtदुष्काळ