शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

वाशिम जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांना ४४ कोटीची दुष्काळी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:06 IST

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळाला मात्र दुष्काळी सवलतीच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रतिक्षा कायम आहे.२०१८ च्या खरीप हंगामात शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, या हंगामातील नुकसानाची पाहणी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (एसडीआरएफ)आणि केंद्र आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून (एनडीआरएफ)करण्यात आली आहे. या पथकाचे निकष आणि अहवालानुसार ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पीक नुकसान झालेल्या शेतकºयांना दुष्काळी मदत दिली जात आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह मालेगाव आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मदत निधी दिला जात आहे. रिसोड तालुक्यात आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषीत आहे. दुष्काळी मदत निधी अजून संपूर्ण पात्र शेतकºयांना मिळालेला नाही. तसेच यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्कही परत मिळालेले नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांनी बुधवारी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीdroughtदुष्काळ