शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

काँग्रेसच्या आमदारांकडून दुष्काळी भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:33 IST

शेतकºयांनी या समितीपुढे आपल्या व्यथा मांडल्या असून, दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील आमदारांची चमू १५ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाली असून, मुंगळा, काटा यासह मानोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी या समितीपुढे आपल्या व्यथा मांडल्या असून, दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी केली जाणार आहे. सध्या राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र विभागामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाराटंचाई तसेच रोजगाराचा प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करीत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या आमदारांची समिती विदर्भातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत आहे. १५ मे रोजी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मालेगाव तालुक्यातील मुंगळा, वाशिम तालुक्यातील काटा, मानोरा तालुक्यातील वापटी येथील दुष्काळी भागाची पाहणी केली. आॅरेंज व्हिलेज अशी ओळख असलेल्या मुुंगळा येथील शेतकºयांना सद्यस्थितीत भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा शेतकºयांनी मांडल्या. पाण्याअभावी संत्रा बागा सुकून जात आहेत. एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व वादळवाºयामुळे संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही भरपाई मिळालेली नाही अशी आपबिती शेतकºयांनी मांडली. काटा परिसरातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याशी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली. रोजगाराअभावी जिल्ह्यातील मजुरांचे अन्यत्र स्थलांतर होणार नाही, याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करावा अशा सूचनाही आमदारांनी केल्या. दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याकरीता शासनाला भाग पाडण्यासाठी हा दुष्काळी दौरा असल्याचे या समितीने सांगितले. या समितीचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार विरेंद्र जगताप, आमदार रणजित कांबळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, नतिकोद्दीन खतीब, समिती समन्वयक अतुल लोंढे आदींनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येचे उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमdroughtदुष्काळFarmerशेतकरीcongressकाँग्रेस