शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

वाशिम जिल्ह्यातील दोन हजारावर लाभार्थी शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:38 PM

दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अंमलात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी रविवार, ८ सप्टेंबरला दिली.१८ ते ४० वर्षे वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. याअंतर्गत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करणाºया पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रती महिना पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियास कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची देखील तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकºयांनी नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभाकरिता नोंदणी केली असून संबंधितांना पेन्शन कार्डचे वितरणही करण्यात आले आहे.१ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागणार आहे. सदर रक्कम ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून देखील लाभार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेइतकीच रक्कम जमा केली जाईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रांमध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येत असल्याचे शैलेश हिंगे यांनी सांगितले.नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेशेतकºयांना त्यांच्या वृद्धपकाळात किमान खर्चाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनस्तरावरून प्रधानमंत्री किसान मानधन योजना हाती घेण्यात आली. याअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना ३ हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. दरम्यान, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना आधारकार्ड, गाव नमुना ८ ‘अ’, बँक पासबुक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव आदी माहिती सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे कळविण्यात आले. लाभार्थ्यांनी नोंदणीकरिता अन्य कुठेही न जाता प्रामुख्याने जिल्ह्यातील गावागावांमध्ये कार्यान्वित असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांवरच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी