शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:31 IST

सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात काठोकाठ भरले आहेत. बहुतांश प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे. त्यात जिल्ह्यातील ४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा जुनच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यात जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यात १६ आगस्टपर्यंतच ५५२. ५० मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७३.७० टक्के आहे. वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि.मी. पाऊस पडतो. गत दोन वर्षांत सप्टेंबर अखेरपर्यंतही पावसाने सरासरी गाठली नव्हती. गतवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे जलस्त्रोतांना आधार मिळाल्याने पाणीटंचाईचे संकट टळले होते. यंदा जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा १ जून ते १७ आॅगस्टरदम्यान अडीच महिन्यांच्या कालावधीत ६९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८९ टक्के आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्के जलसाठा झाला आहे. त्यात गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने प्रकल्पांच्या पातळीत अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडत असल्याने तीन तालुक्यातील एकूण ३९ प्रकल्पांची पातळी शंभर टक्के झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१८ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्या खालीचजिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सर्व प्रकल्पांची सरासरी पातळी ६९.६४ टक्के झाली आहे. त्यात ५२ प्रकल्प काठोकाठ भरले असले तरी, जिल्ह्यातील १८ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांच्या खालीच आहे. त्यात १३ प्रकल्पातील उपयुक्त साठ्याची टक्केवारी शुन्य असून, ५ प्रकल्पांची पातळी ५ टक्के, तर उर्वरित १० प्रकल्पांची पातळी १० ते २५ टक्क्यांपर्यंत आहे.

५२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’जिल्ह्यात तीन मध्यम आणि ११ बॅरेज आणि १२२ लघू प्रकल्प मिळून एकूण १३६ प्रकल्प आहेत. त्यातील वाशिम येथील एकबुर्जी आणि मालेगाव तालुक्यातील सोनल हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पातही ७८ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. शिवाय वाशिम तालुक्यातील ७, मालेगाव तालुक्यातील १२, कारंजा तालुक्यातील २, मंगरुळपीर तालुक्यातील १०, रिसोड तालुक्यातील २ आणि मानोरा तालुक्यातील १७ प्रकल्प मिळून ५२ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणriverनदीRainपाऊस