शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:31 IST

सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात काठोकाठ भरले आहेत. बहुतांश प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे. त्यात जिल्ह्यातील ४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा जुनच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यात जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यात १६ आगस्टपर्यंतच ५५२. ५० मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७३.७० टक्के आहे. वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि.मी. पाऊस पडतो. गत दोन वर्षांत सप्टेंबर अखेरपर्यंतही पावसाने सरासरी गाठली नव्हती. गतवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे जलस्त्रोतांना आधार मिळाल्याने पाणीटंचाईचे संकट टळले होते. यंदा जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा १ जून ते १७ आॅगस्टरदम्यान अडीच महिन्यांच्या कालावधीत ६९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८९ टक्के आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्के जलसाठा झाला आहे. त्यात गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने प्रकल्पांच्या पातळीत अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडत असल्याने तीन तालुक्यातील एकूण ३९ प्रकल्पांची पातळी शंभर टक्के झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१८ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्या खालीचजिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सर्व प्रकल्पांची सरासरी पातळी ६९.६४ टक्के झाली आहे. त्यात ५२ प्रकल्प काठोकाठ भरले असले तरी, जिल्ह्यातील १८ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांच्या खालीच आहे. त्यात १३ प्रकल्पातील उपयुक्त साठ्याची टक्केवारी शुन्य असून, ५ प्रकल्पांची पातळी ५ टक्के, तर उर्वरित १० प्रकल्पांची पातळी १० ते २५ टक्क्यांपर्यंत आहे.

५२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’जिल्ह्यात तीन मध्यम आणि ११ बॅरेज आणि १२२ लघू प्रकल्प मिळून एकूण १३६ प्रकल्प आहेत. त्यातील वाशिम येथील एकबुर्जी आणि मालेगाव तालुक्यातील सोनल हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पातही ७८ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. शिवाय वाशिम तालुक्यातील ७, मालेगाव तालुक्यातील १२, कारंजा तालुक्यातील २, मंगरुळपीर तालुक्यातील १०, रिसोड तालुक्यातील २ आणि मानोरा तालुक्यातील १७ प्रकल्प मिळून ५२ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणriverनदीRainपाऊस