शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:31 IST

सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात काठोकाठ भरले आहेत. बहुतांश प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे. त्यात जिल्ह्यातील ४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा जुनच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यात जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यात १६ आगस्टपर्यंतच ५५२. ५० मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७३.७० टक्के आहे. वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि.मी. पाऊस पडतो. गत दोन वर्षांत सप्टेंबर अखेरपर्यंतही पावसाने सरासरी गाठली नव्हती. गतवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे जलस्त्रोतांना आधार मिळाल्याने पाणीटंचाईचे संकट टळले होते. यंदा जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा १ जून ते १७ आॅगस्टरदम्यान अडीच महिन्यांच्या कालावधीत ६९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८९ टक्के आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्के जलसाठा झाला आहे. त्यात गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने प्रकल्पांच्या पातळीत अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडत असल्याने तीन तालुक्यातील एकूण ३९ प्रकल्पांची पातळी शंभर टक्के झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१८ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्या खालीचजिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सर्व प्रकल्पांची सरासरी पातळी ६९.६४ टक्के झाली आहे. त्यात ५२ प्रकल्प काठोकाठ भरले असले तरी, जिल्ह्यातील १८ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांच्या खालीच आहे. त्यात १३ प्रकल्पातील उपयुक्त साठ्याची टक्केवारी शुन्य असून, ५ प्रकल्पांची पातळी ५ टक्के, तर उर्वरित १० प्रकल्पांची पातळी १० ते २५ टक्क्यांपर्यंत आहे.

५२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’जिल्ह्यात तीन मध्यम आणि ११ बॅरेज आणि १२२ लघू प्रकल्प मिळून एकूण १३६ प्रकल्प आहेत. त्यातील वाशिम येथील एकबुर्जी आणि मालेगाव तालुक्यातील सोनल हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पातही ७८ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. शिवाय वाशिम तालुक्यातील ७, मालेगाव तालुक्यातील १२, कारंजा तालुक्यातील २, मंगरुळपीर तालुक्यातील १०, रिसोड तालुक्यातील २ आणि मानोरा तालुक्यातील १७ प्रकल्प मिळून ५२ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणriverनदीRainपाऊस