शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वाशिम जिल्ह्यात २८ मे पासून अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:57 PM

वाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार असून, त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी समन्वयातून विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या.आरोग्य विभाग आणि युनिसेफच्यावतीने स्थानिक नियोजन भवनात आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.  यावेळी न्यूमोनिया, डायरिया या आजारापासून सावध राहण्यासाठी नेमके काय करावे याची माहिती देण्यात आली. तसेच आगामी अतिसार नियंत्रण पंधरवडा, पूर्वनियोजन, विविध उपक्रम आदींची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्वाधिक बालमृत्यू हे न्युमोनिया व डायरिया या दोन आजारामुळे होतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी व स्वच्छता विभागाने मिळून एकात्मिक पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना दीपक कुमार मीना यांनी दिल्या. २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याचे पूर्वनियोजन करणे, विविध विभागाने सक्रिय सहभाग घेणे तसेच पुढील दोन महिन्यामध्ये एक पथदर्शी कार्यक्रम तयार करून पुढील दोन वर्षामध्ये न्यूमोनिया व डायरिया या आजाराच्या निर्देशांकमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले आहेत. यावेळी शुन्य ते पाच या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या न्युमोनिया (श्वसनदाह) आणि डायरिया (हगवण) या आजारांवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात एकात्मिक पध्दतीने प्रयत्न केले जातील, असे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के,  जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, युनिसेफचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश गढरी, डॉ. वैभव महात्मे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य