शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

दुष्काळ जाहीर होवूनही कर्ज पुनर्गठणाचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:36 IST

रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील ज्या गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला, तेथील शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील सवलती लागू करून त्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करावे, असा निर्णय मध्यंतरी शासनाने जाहीर केला; मात्र जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत.पर्जन्यमानात झालेली घट, खालावलेली भूजल पातळी यासह तत्सम बाबी लक्षात घेऊन राज्याच्या महसूल व वन विभागाने नोव्हेंबर २०१८ या महिन्यात राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुक्याचाही समावेश झाला होता. यासह मानोरा तालुक्यातील उमरी आणि मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे या महसूली मंडळांतर्गत येणाºया गावांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलात ३३ टक्के सवलत, शेतकºयांच्या मुलांना शुल्क माफी, रोजगार हमी योजनेत शिथिलता यासह संबंधित गावांमधील शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र रिसोड तालुक्यातील १०० व दोन महसूली मंडळांतर्गत येणाºया जवळपास ३५ गावांमधील शेतकºयांना ना सवलतीचा लाभ मिळाला ना त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले. यामुळे संबंधित शेतकºयांना चालू खरीप हंगामात नव्याने पीक कर्ज देखील मिळू शकले नाही. प्रशासन, शासनाच्या उदासिनतेमुळे शेतकºयांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

३१ जुलै उलटूनही झाली नाही कार्यवाहीखरीप २०१८ च्या हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत होती. या मुदतीपर्यंत जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकºयांची संमती घेऊन पीक कर्जाचे व्याजासह मध्यम मुदत कर्जात पुनर्गठण करण्यात येणार होते. त्याची कार्यवाही बँकांनी ३१ जुलै २०१९ पर्यंत करून शेतकºयांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते; मात्र तसे झाले नाही. यासंदर्भात अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित बँकांना सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

खरीप पीक कर्ज वाटप केवळ २० टक्के!यावर्षी खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे तथा बँकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ३ आॅगस्टअखेर केवळ ३१८ कोटी अर्थात २०.७८ टक्केच पीक कर्ज वाटप होवू शकले.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी