शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

दुष्काळ जाहीर होवूनही कर्ज पुनर्गठणाचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:36 IST

रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील ज्या गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला, तेथील शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील सवलती लागू करून त्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करावे, असा निर्णय मध्यंतरी शासनाने जाहीर केला; मात्र जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत.पर्जन्यमानात झालेली घट, खालावलेली भूजल पातळी यासह तत्सम बाबी लक्षात घेऊन राज्याच्या महसूल व वन विभागाने नोव्हेंबर २०१८ या महिन्यात राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुक्याचाही समावेश झाला होता. यासह मानोरा तालुक्यातील उमरी आणि मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे या महसूली मंडळांतर्गत येणाºया गावांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलात ३३ टक्के सवलत, शेतकºयांच्या मुलांना शुल्क माफी, रोजगार हमी योजनेत शिथिलता यासह संबंधित गावांमधील शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र रिसोड तालुक्यातील १०० व दोन महसूली मंडळांतर्गत येणाºया जवळपास ३५ गावांमधील शेतकºयांना ना सवलतीचा लाभ मिळाला ना त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले. यामुळे संबंधित शेतकºयांना चालू खरीप हंगामात नव्याने पीक कर्ज देखील मिळू शकले नाही. प्रशासन, शासनाच्या उदासिनतेमुळे शेतकºयांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

३१ जुलै उलटूनही झाली नाही कार्यवाहीखरीप २०१८ च्या हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत होती. या मुदतीपर्यंत जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकºयांची संमती घेऊन पीक कर्जाचे व्याजासह मध्यम मुदत कर्जात पुनर्गठण करण्यात येणार होते. त्याची कार्यवाही बँकांनी ३१ जुलै २०१९ पर्यंत करून शेतकºयांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते; मात्र तसे झाले नाही. यासंदर्भात अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित बँकांना सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

खरीप पीक कर्ज वाटप केवळ २० टक्के!यावर्षी खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे तथा बँकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ३ आॅगस्टअखेर केवळ ३१८ कोटी अर्थात २०.७८ टक्केच पीक कर्ज वाटप होवू शकले.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी