शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटल्याने कारंजात सेनेचे नुकसान

By admin | Updated: October 20, 2014 01:06 IST

काँग्रेसची एक जागा कायम

वाशिम : विधानसभा निवडणुकीत आघाडी व युती तुटली. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला त्याचा फटका बसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी प्रबळ उमेदवार न मिळाल्याने त्याचाही फटका जाणवल्याचे चित्र निवडणूक निकालावरून दिसून येते. युती व आघाडी असताना वाशिम विधानसभा मतदारसंघ काँग्रेस व भाजपाकडे होता. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये युती व आघाडी असताना काँग्रेस व भाजप उमेदवार देत होते. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये युती व आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना लढतीत होते. युतीची व आघाडीची फारकती झाल्याने प्रत्येकाने आपआपले उमेदवार यावेळी उभे केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती व आघाडी तुटल्याने प्रत्येक पक्षासमोर प्रबळ उमेदवार नसल्याने अनेक ठिकाणी कोणताही उमेदवार उभा करण्यात आला. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांनी भाजपला सर्वाधिक मतदान केल्याचे दिसून येते. तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना १ लाख ४७ हजार १७८ मतदारांनी मतदान केले. शिवसेनेच्या उमेदवारांना ६८५0५ मतदारांनी मतदान केले. काँग्रेस उमेदवारांना १ लाख ९ हजार ९१७, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना ४८ हजार ५६७ मतदारांनी मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. सेना व भाजपा युती असती, तर युतीमध्ये कारंजाकडे असलेली जागा शिवसेनेच्या ताब्यात असती. कारंजा येथे शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांना पडलेल्या मताची बेरीज केली, तर ५१ हजार २८ मते युतीच्या उमेदवारास पडली असती. युतीचा उमेदवार ठरल्याप्रमाणे शिवसेनेचा असता. युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केला. या घडामोडीमुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले. युती असती, तर रिसोडमध्ये युतीच्या उमेदवारास ७२६५६ आणि आघाडी असती तर ७६७५0 मतदान झाले असते, हे या निवडणुकीत झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. झालेही तसेच. येथे काँग्रेसची जागा निवडून आल्याने येथे आघाडी तुटल्याचा काही परिणाम झाला नाही. वाशिममध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार केला, तर येथेही युतीचाच विजय निश्‍चित दिसून येतो व झालेही तसेच. कारंजा येथे मतदारांनी केलेल्या मतदानाचा विचार करता येथे युतीचीच जागा निवडून येणार, असे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. परंतु, ही जागा युती असती तर शिवसेनेच्या वाटेला असती व इथे शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय असता. पण, फारकतीमुळे येथे सेनेचे नुकसान दिसून येत आहे. युती व आघाडी नसली तरी मतदारांना मात्र आपले मत नोंदवताना कसलीही अडचण भासली नाही.