शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

ग्रामसभेत ठराव घेवून पाणी आरक्षणाचा निर्णय घ्या - वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 6:44 PM

वाशिम : पैनगंगा नदीवरील कोकलगाव, जुमडा बॅरेज परिसरातील नागरिकांसाठी बॅरेजमधून पिण्याचे पाणी आरक्षित करण्याची गरज आहे काय, यासंदर्भात ग्रामपंचायतींचा ठराव घेवून निर्णय घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १९ मार्च रोजी दिले. 

ठळक मुद्दे गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवून उर्वरित पाणी एकबुर्जी प्रकल्पात आणण्यासाठी उपाययोजना करावी, असे पत्र आमदार लखन मलिक यांनी दिले होते.त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना उपरोक्त निर्देश दिले.

वाशिम : पैनगंगा नदीवरील कोकलगाव, जुमडा बॅरेज परिसरातील नागरिकांसाठी बॅरेजमधून पिण्याचे पाणी आरक्षित करण्याची गरज आहे काय, यासंदर्भात ग्रामपंचायतींचा ठराव घेवून निर्णय घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १९ मार्च रोजी दिले. कोकलगाव, जुमडा बॅरेजमधून एकबुर्जी प्रकल्पात पाणी आणण्याकरिता शासनाने योजना मंजूर केली. मात्र, त्यास बॅरेज परिसरातील गावांचा विरोध होत आहे. तथापि, शेती, जनावरांसाठी पाणी आरक्षित ठेवून उर्वरित पाणी एकबुर्जीत सोडण्यास आमचा विरोध नसल्याचे संबंधितांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे संबंधित गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवून उर्वरित पाणी एकबुर्जी प्रकल्पात आणण्यासाठी उपाययोजना करावी, असे पत्र आमदार लखन मलिक यांनी जिल्हाधिकाºयांना १७ मार्च रोजी दिले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना उपरोक्त निर्देश दिले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे वाशिम न.प. ला आदेशएकबुर्जी प्रकल्पात आगामी जून महिन्यापर्यंत पुरेल, एवढा जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, वाशिम नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे आमदार लखन मलिक यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले होते. दरम्यान, १९ मार्च रोजी जिल्हाधिकाºयांनी वाशिम न.प. ला पत्र पाठवून पाण्याचा होणारा अपव्यय, ही अत्यंत गंभीर बाब असून त्यावर विनाविलंब नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील कार्यवाही अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकाºयांची राहील, असे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयLakhan Malikलखन मलिक