शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि ...

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि झोपड्या वाहून गेलेल्या आहेत, छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय चालविणे अशक्य झालेले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा नसल्यामुळे गरिबांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पिकांच्या नासाडीचे पंचनामे कुर्म गतीने होत आहेत. महाराष्ट्रभर पसरलेल्या जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पाहून काळजी व्यक्त केलेली आहे. या संबंधित जमात-ए-इस्लामी हिंद शाखा रिसोडने २४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदतीचे वितरण करण्यात यावे. कच्च्या घरांची आणि झोपड्यांच्या झालेल्या हानीचे सुद्धा पंचनामे करून त्यांनाही तत्काळ आर्थिक सहायता प्रदान करण्यात यावी. शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना पुन्हा जीवन जगण्याची संधी देण्यात यावी. कोविड दरम्यान मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना शेख रिजवान, शेख वकार, प्रा.मो. जुनेद,मकसूद अहमद मोइनुद्दीन आदी उपस्थित होते.