शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रिसोड तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि ...

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि झोपड्या वाहून गेलेल्या आहेत, छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय चालविणे अशक्य झालेले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा नसल्यामुळे गरिबांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पिकांच्या नासाडीचे पंचनामे कुर्म गतीने होत आहेत. महाराष्ट्रभर पसरलेल्या जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पाहून काळजी व्यक्त केलेली आहे. या संबंधित जमात-ए-इस्लामी हिंद शाखा रिसोडने २४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदतीचे वितरण करण्यात यावे. कच्च्या घरांची आणि झोपड्यांच्या झालेल्या हानीचे सुद्धा पंचनामे करून त्यांनाही तत्काळ आर्थिक सहायता प्रदान करण्यात यावी. शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना पुन्हा जीवन जगण्याची संधी देण्यात यावी. कोविड दरम्यान मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना शेख रिजवान, शेख वकार, प्रा.मो. जुनेद,मकसूद अहमद मोइनुद्दीन आदी उपस्थित होते.