शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

कापसाचे दर गडगडले; उत्पादक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:41 IST

व्यापारी हमीदरापेक्षा २०० ले ३०० रूपयांनी कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा अवकाळी पावसामुळे कापसाची प्रतवारी खालावली, तसेच ऊचल कमी असल्याने जिल्ह्यात कापसाचे दर पडले आहेत. त्यामुळे कापूस ऊत्पादकांची पंचाईत झाली आहे. व्यापारी हमीदरापेक्षा २०० ले ३०० रूपयांनी कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढत आहे. तथापि, या ठिकाणी चुकाऱ्यांना विलंब होत असल्याने येथेही कापूस विकावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे कापसाची विक्री ठप्प पडली आहे.मान्सून विलंबाने दाखल झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यात यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट झाली होती. सरासरी २९ हजार ७०१ हेक्टरवर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना केवळ २५ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी शेतकºयांनी केली होती. त्यात मानोरा तालुक्यात मात्र सरासरी क्षेत्र ७ हजार २७८ हेक्टर असताना या तालुक्यात १३ हजार २३२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात शेतकºयांनी कपाशीचीच पेरणी केली होती. त्या खालोखाल कारंजा तालुक्यात ९ हजार ९६ हेक्टर, तर मंगरुळपीर तालुक्यात १ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रात कपीची पेरणी झाली होती. इतर तालुक्यांत मात्र एक हजार हेक्टर क्षेत्रातही कपाशीची पेरणी होऊ शकली नव्हती. सुरुवातीच्या विषम वातावरणानंतर कपाशीचे पीक चांगले बहरले; परंतु बोंडअळीने सलग तिसºया वर्षी या पिकावर आक्रमण केले, तर आॅक्टोबर अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले. त्यातच बोंडअळीवर नियंत्रण शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी पहिल्या, दुसºया वेचणीनंतरच कपाशीची उलंगवाडी करून शेत रब्बीसाठी तयार केले. आधीच कपाशीचे उत्पादन घटले असताना बाजारात या शेतमालास अपेक्षीत दरही मिळेनासे झाले. गतवर्षी व्यापाºयांनी ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत कपाशीची खरेदी केली असताना यंदा मात्र कपाशीला अधिकाधिक ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलने त्यांच्याकडून कपाशीची खरेदी होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी पंचाईत झाली असून, अनेक शेतकरी शासकीय केंद्रावर कापूस विकण्याची तयारी करीत आहेत. तथापि, या केंद्रावर कापूस विकल्यानंतर शेतकºयांना आठ ते दहा दिवस चुकाºयासाठी प्रतिक्षा करावी लागते. आरटीजीएस पद्धतीने शेतकºयांच्या थेट खात्यावर शासकीय केंद्राकडून कपाशीची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे या केंद्रावर शेतमाल विकावा की नाही, असाही प्रश्न शेतकºयांना पडला आहे.कापूस पणन महासंघाच्या शासकीय केंद्रांवर समाधानकारक खरेदीजिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रावर कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाचे (सीसीआय) प्रतिनिधी म्हणून कापूस पणन महासंघाने (फेडरेशन) जिल्ह्यात कारंजा आणि मानोरा येथे २ डिसेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या दोन्ही केंद्रांना शेतकºयांचा समाधानकारक प्रतिसाद लाभत आहे. त्यात कारंजा येथील केंद्रावर १९ डिसेंबरपर्यंत २ हजार २६ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. तर मानोरा येथील केंद्रावर ११५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या केंद्रावर कापूस विकण्यासाठी शेतकरी उत्सूूक असल्याने यंदा शासकीय खरेदीत १० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी होण्याचा अंदाज अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शासनाने यंदा मध्यम धाग्याच्या कपाशीसाठी ५,२२५ रुपये, तर लांब धाग्यासाठी ५,५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत.

कारंजात २ डिसेंबरपासून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. केंद्रावर कापूस विकण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आता येत आहेत. आजवर या ठिकाणी २ हजार २६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या ठिकाणी ५ हजार क्विंटल पेक्षा अधिक कापूस खरेदी होण्याचा अंदाज आहे.- यू. एस. जानोरकर, ग्रेडर कारंजा (फेडरेशन)

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस