शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Corona Efect : राष्ट्रीय महामार्गांची कामे ‘लॉकडाउन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:09 AM

कोट्यवधींच्या मशीन रस्त्यावर बेवारस ऊभ्या असल्याचे चित्र चारही मार्गावर दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ जारी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांची कामे बंद पडली असून, कामासाठी आणलेल्या कोट्यवधींच्या मशीन रस्त्यावर बेवारस ऊभ्या असल्याचे चित्र चारही मार्गावर दिसत आहे.सुमारे अडीच वर्षांपूर्वी अकोला-हिंगोली, यवतमाळ-नांदेड, नागपूर-औरंगाबाद, अकोला-आर्णीसह इतर दोन मार्गाना महामार्गाचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. या महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सततचा अवकाळी पाऊस आणि पाणीटंचाईमुळेही या कामांत मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या कामांना वेग देण्यात आला. चारही दिशेने होत असलेल्या या महामार्गांच्या कामाचे कंत्राट आठ कंत्राटदार कंपन्यांना विभागून देण्यात आले होते. आता ही कामे अंतीम टप्प्यात असताना कोरोना विषाणूचा संसर्ग चीनमधून भारतात आणि महाराष्ट्रातही पसरला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असून, देशभरात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी केले, तर राज्यात कठोर संचारबंदीची अमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कामे स्थगित करण्यात आली. त्यात वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचाही समावेश आहे. ही कामे बंद पडल्याने कामावर असलेले कामगार आणि कंत्राटदार आपापल्या गावी परत गेले असून, काही निवडक मंडळी कामासाठी उभारलेल्या प्रकल्पावर थांबून आहे. तथापि, कामासाठी वापरण्यात येणारी विविध यंत्रे, रोलर, मालवाहू वाहने कंत्राटदार कंपनीच्या प्रकल्पावर ठेवण्यात आली आहेत, तर प्रत्यक्ष रस्ता कामावर सिमेंटचे मिश्रण टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड मशीन आणि रोलर रस्त्यावरच बेवारस स्थितीत पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्या मंगरुळपीर-मानोरा, मंगरुळपीर-वाशिम, मालेगाव-मेहकर, अकोला-शेलुबाजार आदि रस्त्यांवर कोट्यवधींच्या मशीन गेल्या आठवडाभरापासून उभ्याच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या कामावर कार्यरत असलेले काही कामगार अद्यापही वाहतूक बंद असल्याने जिल्ह्यात अडकून पडले असून, जिल्हा प्रशासनाने त्यांची माहिती संकलित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

बहुतांश कामगार परतलेजिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कामगारांसह बाहेरच्या राज्यातील कामगारही होते. तथापि, लॉकडाऊनच्या आदेशानंतर या कामगारांसाठी धान्य पुरवठा करणे आणि भोजन तयार करणे अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांनी जिल्हा बंदीच्या आदेशापूर्वीच बहुतांश कामगारांना त्यांच्या गावी परत पाठविले असून, आता काही मंडळीच ठिकाणावर चौकीदारी करीत आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस