उमेदवारांची चाचपणी ‘नागपूर’च्या दरबारात

By Admin | Updated: May 22, 2014 23:35 IST2014-05-22T23:21:09+5:302014-05-22T23:35:22+5:30

विधान परिषदेचा शिक्षक मतदारसंघ : काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग

Candidates' check-in 'Nagpur' courtroom | उमेदवारांची चाचपणी ‘नागपूर’च्या दरबारात

उमेदवारांची चाचपणी ‘नागपूर’च्या दरबारात

वाशिम : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या चाचपणी अहवालाची जबाबदारी काँग्रेस श्रेष्ठींनी रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर सोपविली आहे. डॉ. राऊत यांच्या चाचपणी अहवालावर प्रदेश काँग्रेस कमिटी उमेदवारांची निवड करणार असल्याचे वृत्त आहे. तमाम शिक्षकांची उत्सुकता ताणून धरलेल्या विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा बिगुल काल वाजला आणि राजकीय घडामोडींनी कमालिचा वेग पकडला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षही उतरल्याने निवडणुकीत रंगत येत आहे. २0 जूनला या निवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. परिणामी, प्रत्येकजण मोर्चेबांधणीत मश्गुल दिसून येत आहे. इतर संघटना व आघाडींचे उमेदवार जाहिर होत असताना, काँग्रेसने अजूनही आपले पत्ते खुले केले नाहीत. काँग्रेसमधून कॉग्रेसच्या शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे चिरंजीव प्रकाश तायडे व कॉग्रेसच्या शिक्षक सेलचे राज्याचे उपाध्यक्ष तथा वाशिमचे प्रा. संतोष दिवटे या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या दोघांमधून नेमकी कुणाची निवड करायची किंवा तिसराच उमेदवार आखाड्यात आणायचा, याची चाचपणी करण्याची जबाबदारी ना. डॉ. राऊत यांच्यावर सोपविली आहे. पक्षाशी एकनिष्ठता, अनुभव, दांडगा जनसंपर्क, शैक्षणिक संस्थानिकांशी संबंध, माध्यमिक व ज्युनिअर शिक्षक संघटनांशी जवळीक, अंतर्गत गटबाजीवर मात करणारे व्यक्तिमत्व, शिक्षक मतदारांना जवळचा वाटणारा उमेदवार आदी दृष्टिकोनातून ही चाचपणी होणार असल्याचे वृत्त आहे. या चाचपणीचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर २५ मे रोजी पक्षाचा उमेदवार जाहिर केला जाणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

Web Title: Candidates' check-in 'Nagpur' courtroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.