शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कार्ली येथे चार एकरातील गहू जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:37 PM

Fire News गहू पिकाला आग लागल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

कार्ली : वाशिम तालुक्यातील कार्ली येथील सखुबाई गोविंदराव मार्गे यांच्या चार एकर शेतातील काढणीला आलेल्या गहू पिकाला आग लागल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत गहू जळून खाक झाल्याने महिला शेतकºयाचे नुकसान झाले.गट क्रमांक १६२ मधील चार एकर शेतातील गहू पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा आरोप सखुबाई मार्गे यांनी केला. कडाक्याचे ऊन, हवा आणि वाळलेला गहू यामुळे क्षणार्धात आग शेतात पसरली. गावातील युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चार एकरातील गहू जळून खाक झाला. विद्युत तारा लोंबकळलेल्या असून, यासंदर्भात महावितरणला वारंवार माहिती दिली. परंतू, याची दखल न घेतल्याने शेवटी या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन गव्हाचे नुकसान झाल्याचा आरोप महिला शेतकºयाने केला. घटनेची माहिती मिळताच तलाठी आकोश राठोड, कृषी सहाय्यक नितीन वाडेकर, ग्राम पंचायत सचिव राजु शेळके, महावितरणचे शाखा अभियंता अमोल नवरे, लाईनमन राहुल देशमुख, सरपंच गोविंदा पाटील, पोलीस पाटील प्रभाकर लाहे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव मार्गे, यांच्यासह मान्यवरांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानभरपाई देण्याची मागणी सखुबाई मार्गे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमfireआगFarmerशेतकरीagricultureशेती