शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

विरोधकांच्या हस्तकांनी बालाजी कारखाना बंद पाडला - राजू शेट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 5:39 PM

श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी  यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनखेडा (वाशिम) - रोजगार निर्मिती, शेतकºयांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात आहे. केशवनगर येथील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असून, हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी  यांनी केशवनगर येथे १८ सप्टेंबर रोजी केले.बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात केशवनगर येथे आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख रसिका ढगे, संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, सुनील धाबेकर, डॉ.चौधरी, जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोेले आदि उपस्थित होते. शेटटी म्हणाले की, रोजगार निर्मिती, शेतकºयाला शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात आहे. म्हणुन हा कारखाना चालु होणे आवश्यक आहे. सध्या कारखाना बँकेच्या ताब्यात असुन त्याचा लिलाव काढला आहे. परंतु काही सभासदांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे लिलाव झाला नाही आणि न्यायालयाचा निकालही झाला नाही. त्यामुळे कारखाना १९ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. तो चालु करण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून न्यायालयीन प्रकरणे सामोपचाराने मिटवावी लागणार आहेत. कारखाना विकणे फायदाचे नाही. यावेळी बालाजी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचा संदेश घेवुन त्यांचे पुत्र सुनिल धाबेकर उपस्थित होते. हा संदेश सरपंच सुमन गालट यांनी वाचुन दाखविला. या संंदेशात म्हटले की, जंगल असलेल्या ठिकाणी कारखान्याची नोंदणी झाल्यापासुन ३९ महिन्यात उभा राहिलेला, १२५० मेट्रीक टन गाळप क्षमता असताना २३०० ते २४०० टन गाळप करणारा, दोन वेळा सुवर्णपदक मिळविणारा, पहिल्या तीन वर्षात कर्ज परतफेड करणारा विदर्भातील पहिला कारखाना म्हणुन बालाजीने नावलौकीक मिळविला होता. परंतु याच भागातील काही विघ्नसंतोषी राजकीय विरोधकांनी कर्मचाºयांत फुट पाडून संप आंदोलने सुरु केली. अनेक कारखान्यांकडे २०० ते ३०० कोटी रुपये कर्ज असतांना केवळ १८ कोटी कर्जासाठी त्रास देण्यात आला. हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले. यावेळी रविकांत तुपकर, रसिका ढगे यांनी विचार व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRaju Shettyराजू शेट्टी