शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:17 AM

११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३०.९५ टक्के पीकर्जाचे वितरण १० जुलैपर्यंत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाला गती देण्याचे निर्देश दिले होते, तर पालकमंत्र्यांनीही २९ जून रोजी पीककर्ज वाटपाला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे.कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पात्र आहेत. यात महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. या योजनेतील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला. तथापि, १८ जून रोजी जिल्ह्यात पुन्हा आधार प्रमाणीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आणि वंचित असलेल्या हजारो शेतकºयांनी आधार प्रमाणीकरणही केले. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढणे अपेक्षीत होते; परंतु ११ जुलैपर्यंतही निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३०.९५ टक्के पीककर्ज वाटप जिल्ह्यात होऊ शकले आहे. त्यात ६८ हजार ९८१ शेतकºयांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे.

४६ हजार १९७ शेतकºयांना प्रतिक्षाजिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पीककर्जासाठी पात्र आहेत. खरीप हंगामाचा विचार करता या शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीककर्ज देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि, ११ जुलैपर्यंत केवळ ६८ हजार ९८१ शेतकºयांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, अद्यापही ४६ हजार १९७ शेतकरी पीककर्जाची प्रतिक्षा करीत आहेत. खरीप पेरणीचा वेळ निघून जात असताना तातडीने पीककर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.५९ टक्के पात्र शेतकºयांना लाभजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १६०० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ शेतकºयांचा समावेश असून, त्यापैकी ६८ हजार ९८१ शेतकºयांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे. पात्र शेतकºयांच्या पीककर्ज वितरणाचे हे प्रमाण ५९.८९ टक्के आहे.जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण प्रक्रिया बंद असल्याने पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. आता आधार प्रमाणीकरण सुरू झाल्याने या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पीककर्जासाठी पात्र असलेला कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दखल घेतली जात आहे.- रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी