दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:17 AM2020-07-12T11:17:00+5:302020-07-12T11:17:19+5:30

११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे.

Allocation of only 31% of the target in two months | दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप

दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३०.९५ टक्के पीकर्जाचे वितरण १० जुलैपर्यंत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाला गती देण्याचे निर्देश दिले होते, तर पालकमंत्र्यांनीही २९ जून रोजी पीककर्ज वाटपाला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे.
कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पात्र आहेत. यात महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. या योजनेतील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला. तथापि, १८ जून रोजी जिल्ह्यात पुन्हा आधार प्रमाणीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आणि वंचित असलेल्या हजारो शेतकºयांनी आधार प्रमाणीकरणही केले. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढणे अपेक्षीत होते; परंतु ११ जुलैपर्यंतही निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३०.९५ टक्के पीककर्ज वाटप जिल्ह्यात होऊ शकले आहे. त्यात ६८ हजार ९८१ शेतकºयांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे.


४६ हजार १९७ शेतकºयांना प्रतिक्षा

जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पीककर्जासाठी पात्र आहेत. खरीप हंगामाचा विचार करता या शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीककर्ज देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि, ११ जुलैपर्यंत केवळ ६८ हजार ९८१ शेतकºयांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, अद्यापही ४६ हजार १९७ शेतकरी पीककर्जाची प्रतिक्षा करीत आहेत. खरीप पेरणीचा वेळ निघून जात असताना तातडीने पीककर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

५९ टक्के पात्र शेतकºयांना लाभ
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १६०० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ शेतकºयांचा समावेश असून, त्यापैकी ६८ हजार ९८१ शेतकºयांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे. पात्र शेतकºयांच्या पीककर्ज वितरणाचे हे प्रमाण ५९.८९ टक्के आहे.

जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण प्रक्रिया बंद असल्याने पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. आता आधार प्रमाणीकरण सुरू झाल्याने या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पीककर्जासाठी पात्र असलेला कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दखल घेतली जात आहे.
- रवि गडेकर,
जिल्हा उपनिबंधक, वाशिम

Web Title: Allocation of only 31% of the target in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.