शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाशिम जिल्ह्यात कृषीपंप जोडणी रखडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 2:18 PM

  वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली.

ठळक मुद्देविशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १८०० लाभार्थींना कृषीपंप जोडणी मिळणे अपेक्षीत आहे. अद्याप ३०० लाभार्थींना कृषीपंप जोडणी देण्यात आली नाही.मागणी करूनही कृषीपंप जोडणी देण्यास विलंब होत असल्याचा आरोप तेजराव वानखेडे यांनी केला.

 वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली.विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १८०० लाभार्थींना कृषीपंप जोडणी मिळणे अपेक्षीत आहे. अद्याप ३०० लाभार्थींना कृषीपंप जोडणी देण्यात आली नाही. गत चार वर्षांपासून हा तिढा कायम आहे. यामुळे मागासवर्गातील शेतकरी लाभार्थींना शेती सिंचनाखाली आणणे कठीण जात आहे. महावितरणकडे मागणी करूनही कृषीपंप जोडणी देण्यास विलंब होत असल्याचा आरोप तेजराव वानखेडे यांनी केला. १८०० पैकी साधारणत: १५०० कृषीपंप जोडण्या पूर्ण झाल्या असून, ३०० कृषीपंप जोडण्या रखडल्या आहेत. सदर कृषीपंप जोडण्या पूर्ण झाल्या असत्या, तर शेतकºयांना गतवर्षी सिंचन करणे शक्य झाले असते. किमान यावर्षी तरी सिंचन शक्य व्हावे यासाठी कृषीपंप जोडणी पूर्ण करावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली.तसेच नवीन वीजजोडणी घ्यायची असेल तर किमान सहा महिने लागतात. या किचकट प्रक्रियेला फाटा देत महावितरणने २४ तासांत वीजजोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, या उपक्रमाची अंमलबजावणी अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसून येते. ‘मोबाईल अ‍ॅप’ आणि ‘आॅनलाईन’ प्रक्रियेचा आधार घेत जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा येथून या उपक्रमास सुरूवात करण्यात आली होती. यानुसार, ग्राहकांना वीज मागणी अर्ज देण्याची गरज नाही. अर्ज आॅनलाईन तथा मोबाईल अ‍ॅपव्दारे करता येतो. मात्र, काही ठिकाणी अद्याप २४ तासांत वीजजोडणी मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याकडे महावितरणने लक्ष पुरवून २४ तासांत वीजजोडणी द्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण