शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

९८०० शेतकऱ्यांचे पीककर्ज ‘लॉकडाउन’च्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 10:27 AM

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्यांपैकी ९८०० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण थांबले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाने थकित कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांची कर्जमाफी दिली. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्यांना नव्याने पीककर्ज मिळणे अपेक्षीत होते; परंतु कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्यांपैकी ९८०० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण थांबले. त्यामुळे त्यांना आता पीककर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सोमवार, ४ मे पर्यंत केवळ ८५ कोटींचे पिक कर्ज वितरित झाले असून त्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज वितरणाचे प्रमाण केवळ ५ कोटी आहे. उर्वरित ८० कोटींचा वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका केवळ नियमित कर्ज भरणाºया आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतर आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकºयांनाच पीककर्जाचे वितरण करीत आहेत. प्रत्यक्षात राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली, तर केंद्रशासनाने २४ मार्चपासून लॉकडाउन जारी केले. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद पडले. त्यात ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्राचे काम बंद झाल्याने शेतकºयांना आधार प्रमाणिकरण करता आले नाही. असे ९ हजार ८०० शेतकरी जिल्ह्यात असून, या शेतकºयांना पीककर्ज देण्यास बँका नकार देत आहेत. त्यामुळे खरीप हंगामासाठी तयारी करणाºया शेतकºयांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून, राज्य शासनाने या समस्येची दखल घेऊन बँकाना पीककर्ज वितरणाचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आधार प्रमाणिकरण रखडलेल्या शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी