शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

वाशिम जिल्ह्यातील ९५ प्रकल्प तहानलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 15:38 IST

१३१ धरणांपैकी निम्म्या धरणांत शुन्य टक्केही उपयुक्त जलसाठा झाला नसून, त्यातील १८ धरणे कोरडीच आहेत, तर ९५ प्रकल्पात मृतसाठाच आहे.

ठळक मुद्दे मि. मी. चा विचार करता यंदा ८९ मि. मी. पावसाची तुट सद्यस्थितीत निर्माण झाली आहे.१८ प्रकल्प अद्याप पूर्णपणे कोरडेच आहेत, तर तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पासह ७७ प्रकल्पांत मृतसाठाच आहे.जुन महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाभरात ६४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना जुलै महिना अर्धा उलटला तरी, केवळ १९.३३ टक्केच पाऊस पडला आहे. त्यात १३१ धरणांपैकी निम्म्या धरणांत शुन्य टक्केही उपयुक्त जलसाठा झाला नसून, त्यातील १८ धरणे कोरडीच आहेत, तर ९५ प्रकल्पात मृतसाठाच आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अद्यापही १५७ गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. पावसाच्या सरासरीत वाढ न झाल्यास यंदा हिवाळ्यापासूनच जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान वार्षिक सरासरी ७९८.७० मि. मी. पावसाची नोंद होते. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील ३२१ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता यंदा मान्सूनला विलंब झाल्याने पावसाच्या सरासरीवर मोठा परिणाम झाला. जिल्ह्यात १ जुन ते १० जुलैदरम्यान २४७.१८ मि. मी. अपेक्षीत असताना गतवर्षी याच कालावधित ३२५.५५ मि. मी. पाऊस पडला, तर यंदा याच कालावधित १५८.४३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात मि. मी. चा विचार करता यंदा ८९ मि. मी. पावसाची तुट सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. यामुळेच जिल्ह्यातील १८ प्रकल्प अद्याप पूर्णपणे कोरडेच आहेत, तर तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पासह ७७ प्रकल्पांत मृतसाठाच आहे. गतवर्षी अर्ध्या हिवाळ्यानंतर जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू लागली होती. अगदी जुन महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाभरात ६४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता, तर ३८२ विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला यातील २७ टँकर बंद झाले, तर २३७ अधिग्रहित विहिरी बंद करण्यात आल्या. तथापि, अद्यापही ३७ गावांना ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, १४५ अधिग्रहित विहिरीतून ११९ गावांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम तालुक्याची स्थिती समाधानकारकजिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांच्या तुलनेत यंदा वाशिम तालुक्यातील पावसाची सरासरी अधिक आहे. तालुक्यात १ जुन ते १० जुलैदरम्यान २२,६३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी थोडी सुधारल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांत सुरू केलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कारंजा तालुक्यात किती उपाय योजनांना मुदतवाढ दिली. त्याचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

टॅग्स :washimवाशिमDamधरणRainपाऊस