शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन मध्यम प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा

By admin | Updated: September 21, 2015 00:09 IST

लघुप्रकल्पातील जलसाठयात वाढ ; मात्र चांगला पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता.

वाशिम : जिल्हयातील महत्वपूर्ण तीन मध्यम आणि १0४ लघु प्रकल्पांमधील जलसाठा पावसाळा संपत आला तरी वाढ झालेली दिसून येत नाही. जिल्हयात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने थोडा फार फरक पडला असून जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्पात जवळपास ६३ टकके जलसाठा आहे. चांगला पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता जाणवत आहे. सद्या जिल्हयातील या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठया प्रकल्पातील जलसाठा यावर्षी १00 टकक्यापर्यंत पोहचला नाही. आजच्या घडीला (२0 सप्टेंबरपर्यत) एकबुर्जी प्रकल्पात ६४.६६ टक्के, सोनल प्रकल्पात ५२.६0 टक्के तर अडाण प्रकल्पात ६७.५0 टक्के जलसाठा आहे. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्हयाची तहान भागविण्याच्या दृष्टीकोणातून महत्वपूर्ण असलेल्या एकबुर्जी या प्रकल्पातील जलसाठयामध्ये वाढ होवू शकलेली नाही. यामुळे वाशिम शहरातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे. या प्रकल्पांमध्ये पाणी पातळी वाढविण्याच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठयाची झपाटयाने बाष्पीभवनामुळे घट होत आहे. १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने प्रकल्पातील जलसाठयात वाढ दिसून येत असली तरी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने अजून जोरदार पावसाची गरज आहे. येत्या काळात जिल्हयात दमदार पाऊस न पडल्यास पाणी टंचाईचे गडद सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने मात्र लघुप्रकल्पातील जलसाठयात वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये अडगाव, गणेशपूर , कोकलगाव बोरव्हा, आसोला, खडकी, भिलडोंगर, हिवरा खुर्द, वाकद, रुई, गीद व फुलउमरी या प्रकलंचा समावेश आहे. हे प्रकल्प ९५ ते १00 टक्के भरली आहेत. ईतर लघु प्रकल्पांमध्येही थोडीफार वाढ दिसून येत आहे.

*पाऊस न झाल्यास पाणी, चारा टंचाईची शक्यता

       मृग नक्षत्रात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस बरसलयाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते. संपूर्ण पावसाळयात ५ ते ६ वेळा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवश्यावर जो साठा शिल्लक आहे त्यावरचं सर्व भागविल्या जात आहे. जोरदार पाऊस न आल्यास जिल्हयात तीव्र पाणी टंचाई व चाराटंचाईस सामोरे जाण्याची वेळ जिल्हावासियांवर येवू शकते.