शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

वाशिम जिल्ह्यातील  ६०७ विद्यार्थ्यांनी दिली ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 9:29 PM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम व जे.डी.चवरे हायस्कुल, कारंजा या दोन केंद्रांवर घेण्यात आली परीक्षाजिल्ह्यातील ३0 शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिली परीक्षापात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्यामुळे घटतोय प्रतिसाद!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सामान्य बौद्धीक क्षमता (१०० गुण), शालेय क्षमता (१०० गुण), विज्ञान (४० गुण), गणित व भूमिती ((२० गुण) आणि समाजशास्त्र (४० गुण) आदी विषयांचा त्यात समावेश असतो. यात उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. दरम्यान, यंदा या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा आणि कारंजाच्या जे.डी.चवरे हायस्कुल अशा दोन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. वाशिमच्या केंद्रावर वाशिम, मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील १३ शाळांमधील विद्यार्थी; तर कारंजाच्या केंद्रावर कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या तीन तालुक्यातील १७ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळितपणे पार पडली, अश्ी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली.

वर्षागणिक घटतोय प्रतिसाद!जिल्ह्यात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पुर्वी ८ केंद्रांवरून परीक्षा घेतली जायची. गतवर्षी चार केंद्रांवरून परीक्षा झाली; तर यंदा मात्र केवळ दोनच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांचा घटता प्रतिसाद यास कारणीभूत मानला जात असून शासनस्तरावरून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची रक्कम प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. 

टॅग्स :examपरीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी