शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:20 PM

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे.सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे.

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. अर्थात या प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे, तर उवरित ७१ प्रकल्पांसह एकूण १२६ प्रकल्पांची पाणी पातळी १८ टक्के च आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करणे आवश्यक आहे.

वाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांपैकी वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे, तर अडाण प्रकल्पात २१ टक्के जलसाठा आहे. सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे. त्याशिवाय वाशिम तालुक्यातील बोराळा, धुमका, काजळांबा, कळंबा महाली, कार्ली, सावंगा, सावरगाव जिरे, सोनखास, सोयता, उमरा कापसे, उमरा शमशोद्दिन, वाई सावळी, उमरा कापसे सं, जनुना सोनवळ, ब्रम्हा संग्रा, सुरखंडी या १६ प्रकल्पांत, मालेगाव तालुक्यातील बोरगांव, ब्राम्हणवाडा, कळमेश्वर, कोल्ही, कुºहळ, मालेगाव, मुंगळा, रिधोरा, सोमठाणा, खडकी, मैराळडोह, या ११ प्रकल्पांत, रिसोड तालुक्यातील  बोरखेडी, हराळ, करडा, मांडवा, मोरगव्हाण, या पाच प्रकल्पांत, मंगरुळपीर तालुक्यातील  दस्तापूर, सार्सी बोथ, सिंगडोह, चांदई, कवठळ या पाच प्रकल्पांत, मानोरा तालुक्यातील आसोला इंगोले, चौसाळा, धानोरा भुसे, गारटेक, गिद, कार्ली, पिंप्री हनुमान, वाईगौळ, हिवरा खु, भिलडोंगर या १० प्रकल्पांत आणि कारंजा तालुक्यातील मोखड पिंप्री, ऋषी तलाव, शहा, सोहळ, मोहगव्हाण, धामणी या सहा प्रकल्पांत मिळून एकूण ५५ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. विशेष म्हणजे यातील ५२ प्रकल्पांतील उपयुक्त साठा डिसेंबर २०१७ च्या मध्यातच संपला होता आता. उर्वरित ६७ मध्यम प्रकल्पांत १६ टक्केही जलसाठा उरलेला नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया भीषण पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाला त्वरीत उपाय योजना कराव्या लागणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिमDamधरण