शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य शेतीसाठी लवकरच कार्यान्वित होणार २१ योजना!

By admin | Updated: April 14, 2017 02:29 IST

वाशिम : शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसायांची जोड देण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने नीलक्रांती धोरण निश्चित केले.

नीलक्रांती: शासन देणार ५० टक्के अनुदान

वाशिम : शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसायांची जोड देण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने नीलक्रांती धोरण निश्चित केले असून, या धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या ५० टक्के अर्थसहाय्याच्या २१ योजना राज्यात राबविल्या जाणार आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभाग वाशिमचे सहाय्यक आयुक्त सु. ना. सुखदेवे यांनी दिली.शेतीला जोडधंदा म्हणून तसेच मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या नीलक्रांती धोरणांतर्गत ५० टक्के अर्थसहाय्याच्या २१ योजना राज्यात राबविण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाच्या ६ मार्च २०१७ रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुखदेवे यांनी दिली.केंद्र शासनाने नीलक्रांती धोरणांतर्गत मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील जलाशये राज्यांतील नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून शाश्वत पद्धतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणीय समतोल राखून मत्स्योत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या धोरणाला अनुसरुन मत्स्य विभागाकडून ५० टक्के अर्थ सहाय्याच्या २१ योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेमध्ये जलाशयांच्या क्षेत्रामध्ये मत्स्य संवर्धनासाठी नवीन तळी तयार करणे, तळ्याचे नुतनीकरण करणे, मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारणी, मत्स्य बीज संवर्धन तलाव संच उभारणी, संवर्धनातील निविष्ठा खर्च, पिंजरा उभारणीसाठी या सहा योजना भू-जलाशयीन क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यांना मूलभूत सुविधा अंतर्गत नवीन नौका व जाळी खरेदी आणि लघू मत्स्यखाद्य कारखान्याची स्थापना या दोन योजना तसेच बचत व निधीद्वारे मच्छीमारांच्या कल्याणासाठी गट विमा योजना, मच्छीमारांसाठी घरकुल योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनेत राज्य शासनाचा ५० टक्के व ५० टक्के लाभार्थींचा हिस्सा राहणार आहे. केंद्र शासनाच्या नीलक्रांती धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भू-जलाशयीन मत्स्य व्यवसाय योजनेचा जास्तीत जास्त संस्था, खासगी मत्स्य कास्तकार, उद्योजक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभाग वाशिमचे सहायक आयुक्त सुखदेवे यांनी केले.